ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१३८

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १३८.

तत्त्वमस्यादि वाक्य उपदेश । नामाचा अर्धांश नाहीं तेथें । म्हणोनी नामसंकीर्तन करितां । जवळी जोडलासि आतां । क्षणु भरी न विसंबे । जिवाचिया जीवना रया ॥ नाम निजधीर गर्जती वैष्णव वीर ।

कळीकाळ यमाचे भार । पळाले तेथें ॥ म्हणोनी नाम वज्रकवच । तोचि निर्गुणाचा अभ्यास । पाहें पा स्वयें प्रकाश विचारुनी ॥ ऐसें सुंदर रूपडें हदयी धरिलें आतां । पाहतां केवीं होये पूर्ण योनि रया ॥

ऐसा सकळां अकळा कळला । हृदयी धरिला समताबुध्दी । बापरखुमादेविवरु विठ्ठलु चिंतितां । तुटली जन्माची आधिव्याधी रया ॥

अर्थ:-

तत्वमसी ह्या महावाक्याचे फल ही नामफलाच्यापेक्षा अर्धेच असते.म्हणुन हे जीवीच्या जीवना आता क्षणभर ही न विसंबता नामसंकिर्तनाला जवळ जोडत आहे. मोठे धैर्यवान वैष्णववीर नामघोषाची गर्जना करत असतात.

त्यामुळे घाबरुन कळीकाळ असलेले यमदुत ही तेथुन पळत सुटतात. त्या नामाच्या वज्रकवचाच्या सुरक्षेमुळे निर्गुणाचा अभ्यास व स्वप्रकाशरुप आत्मज्ञान ही तपासता येते. असे ते सुंदर रुप मनात धरले तर परत जन्म कसा येईल?

असे ते माझे पिता व रखुमाईचे पती जे इतर कोणत्याही साधनाने कळत नाहीत.त्यांना समताबुध्दीने हृदयी धरल्यामुळे माझी जन्ममरणाची आधीव्याधी समुळ तुटुन गेली असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *