ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.258

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २५८

चातकाचे जिवन घनु । तरी तो साये एकाधिनु । आला वेळु भुलावणु । जैसा नलिनिसी नाही भानु ॥ चंद्रासवे चकोर मिळोनियां पूर्णिमेसी विरोधु मांडिला ।

तो योग दुर्मिळ म्हणोनी तो प्रसंगु विपाईला वेळा रया ॥ तैसे माणुसपण सहज तनुवरी देवाचा वारा स्वाधिनु । तैसा बापरखुमाविवरू विठ्ठलु न विसंबावा एकु क्षणु ॥

अर्थ:-

चातकाला पाणी म्हणजे फक्त मेघांतून पडेल तेच असते.पण तो योग विरळच असतो. तसेच सूर्यविकासिनी कमलिनीला सूर्याचा योग क्वचित येतो. चकोरांना पौर्णिमेच्या चंद्राचा योग क्वचित येतो.

तसा मनुष्य जन्म मिळाण्याचा योग क्वचितच येतो. असा हा दुर्लभ मनुष्य जन्म तुला प्राप्त झाला आहे. अशा वेळ माझे पिता रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचे चिंतन करण्यात एका क्षणाचा देखील विलंब करू नको.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *