ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१५८

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-५ रे, नामग्रहण अभंग १५८

सकळ संप्रदाय श्रीहरि । जो बैसोनि जप करी । जिव्हे महादेवाचे अंतरी । सर्वकाळ वसतसे ॥ रामनामें जप करी । तोचि तरे भवसागरीं । पितरांसहित निर्धारी ।

वैकुंठपुरीं पावले ॥ नित्य सत्य समाधान । निर्मळ करावें मन । नित्य तयासीे नारायण । वैकुंठवास करील ॥ बापरखुमादेविवर सिद्धि । तरुणोपाय हेचि बुद्धि । कृपा करील कृपानिधी । ऐसिया भक्तांशी जाणावें ॥

अर्थ:-

महादेवाच्या जिव्हेवर बसलेल्या रामनामाच्या जपा मुळे तेच नाम जपणाऱ्या सांप्रदायिकाला सतत वैकुंठवास मिळतो. जो सतत रामनाम जपतो तो भवसागर तरुन पितरांसह वैकुठाला जातो.

जसे करणाऱ्याला नित्य सत्य, समाधान, निर्मळ मन व प्रत्यक्ष तो नारायण लाभतो व तो ही वैकुंठाला वास करतो. ते माझे पिता व रखुमाईचे पती यांचे नाम घेतल्याने सर्व सिध्दी प्राप्त होतात ती बुध्दीच त्याचा तरणोपाय बनते.तो कृपानिधी त्याच्या वर कृपा करतो असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *