ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.285

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २८५

शांती क्षमा दया निवती नियॊग । होऊनी सर्वांग आत्माभोगी ॥
नाही अंतरूप सर्वही चैतन्य । चिदानंदघन बिंबलेसे ॥
मायीक वृत्तीचा झणीं धरिसी संग । इंद्रियाचा पांग सांडी रया ॥
ज्ञानदेव म्हणे कल्पना काजळी । दिपी दीपमेळी पाजळी वो जगी ॥

अर्थ:-

परमात्मप्राप्तीला साधनभूत असणा-या शांती क्षमा दयादि अंतःकरणवृत्ति यत्किंचित न्यून न राहाता शांत होऊन सर्वांगाने आत्मसुखाचा आनंद भोगितात. ज्याला अंत नाही व रूप नाही, असे चिदानंदघन चैतन्य सर्वत्र प्रतिबिंबित झालेले आहे.

त्यात मायिक वृत्तीचा संग धरून इंद्रियांची हौस फेडण्याचा कदाचित मनात संकल्प कराल. तर तो सोडून द्या रे गड्यांनो माऊली ज्ञानदेव सांगतात आत्मस्वरूप दिव्याच्या ठिकाणची कल्पनारूपी काजळी झांडून आत्मरूपी दिवा पाजळणे येवढेच मनुष्याचे जगांत कर्तव्य आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *