ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.280
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २८०
जनवन हरि ने पाहाता भासे । घटमठी दिसे तदाकारू ॥
फिटती भुर रे धुम उठी तेज । अक्षरीं उमज गुरूकृपें ॥
खुटली मुक्ति राहिले अव्यक्तीं । एकरूप ज्योती तदाकार ॥
ज्ञानदेव क्षर अक्षर उमजें । बापरखुमादेविवर हृदयी विराजे ॥
अर्थ:-
जरी पहावयाच नाही म्हटले तरी सर्वत्र जनी वनी श्रीहरीच भासतो. घट मठ इत्यादी पदार्थ तदाकारच दिसतात.असा बोध झाला म्हणजे सर्व युक्त्या कुंठीत होऊन जातात. आणि एक परमात्मस्वरूपच शिल्लक राहाते.
नाहीसा झाला म्हणजे अग्नी प्रगट होता. त्याप्रमाण मायेचा निरास करून परमत्म्याचे ज्ञान करून घ्यावे. क्षर अक्षराचे स्वरूपहुन निराळा जो रखुमादेवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठल त्यांना ओळखले त्यामुळे ते माझ्या हृदयांत कायमचा विराजमान झाले आहेत. असे माऊली सांगतात.