ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.228

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २२८

जंववरी जाड नव्हे उजाड । नाही काढावया प्राणा । मग मूढा पडसी संसार सांकड़ा । कांही करी अपुला उवेढा रया ॥

जाड रे जाड शेवटीचा धंद । पडियेलेसी भवकुंडा । एकीकडे जन्म एकीकडे मरण । न निमेचि धंदा कुवाडा रया ॥ थिल्लरींचे जळ मपितरे मीना ।

जंव न तपे आतपु हा परिमळु । जंव हा आयुष्य वोघु । न सरे तंव टाकी आगाधु । पुढे आहे हलकल्लोळु रया ॥ भांड्याचे घर किती वाढविसीरे गव्हारा ।

दिनु गेलिया काय पंथु आहे । ऐसे जाणुनिया वेगी ठाकी लवलाहे । बापरखुमादेविवरा विठ्ठलाचे पाय रया ॥

अर्थ:-

जो पर्यंत शरीरातून प्राण निघून जाऊन शरीर पडले नाही म्हणजे मृत झाले नाही, तो पर्यंतच आपला आत्मलाभाचा प्रयल नाही केला तर संसाराच्या संकटात पडशील.या शरीराच्या धंद्यात म्हणजे

भवबंधात पडला आहेस कसा ते पहा.एकीकडे जन्म एकीकडे मरण हा जन्म मरणाचा कठीण धंदा कधीही संपत नाही. डबक्यातल्या पाण्यावर भरवसा ठेवून राहणाया माशांचे जीवित सूर्याने तप्त होऊन पाणी आटवून टाकले नाही

तोपर्यंतच असते.म्हणून जोपर्यत आयुष्याचा ओघ आहे तोपर्यंत त्या ओघामध्ये पडून परमात्म समुद्राला जाऊन मिळ.असे केले नाही तर पुढे जन्ममरणाचा फार मोठा हलकल्लोळ आहे.हे शरीर काळाचे असून

भाडोत्र्याच्या घराप्रमाणे आपण या शरीरात आहोत. म्हणून त्याच्या करिता किती व्यवहार वाढविणार. दिवस संपल्याल्यावर जसा रस्ता दिसत नाही त्याप्रमाणे आयुष्य संपल्यावर तुझ्याकडून काही एक होणार नाही. हे सर्व लक्षात घेऊन सर्व व्यवहार बाजूला ठेवून दे. व रखुमादेवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठल त्याचे पाय धर असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *