ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.299

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २९९

स्वभावें विचारतां मही । सम ब्रह्म दिशा दाही । एकु एकला पाहीं । सर्वाघटीं बाईये वो ॥१॥
दुजे द्वैत हेतु सांडी । एक तत्वसार मांडी । हरिवीण इयें पिंडीं । नाही वासु वो माये ॥२॥

काय सांगो याच्या गोष्टी । अवघा दिसे हाचि सृष्टि । विश्वरुप स्वरुपकिरिटी । अर्जुना दिठी दावियलें ॥३॥ ज्ञानदेवी दीप उघड । उजळूनी केलासे वाड । माया देवी आम्हां नाहीं चाड । अवघा गोड हरि आम्हां ॥४॥

अर्थ:-

मी सहज पृथ्वीवर फिरत असता दाही दिशांत व सर्व जीवमात्रात एकच असणारे परब्रह्म भरुन राहिले आहे. असे पाहिले. याकरता अनेकत्वाच्या भावाला कारण जे द्वैत ते सोडून मुख्य सार जो परमात्मा श्रीहरि याच्याशिवाय शरीररुपी पिंडात कोणाचीही वस्ती नाही. अशी मनाची समज राहु द्या. अशा श्रीहरिच्या गोष्टी काय सांगाव्यात?

सर्व सृष्टीत हाच व्यापून राहिला आहे. आणि एवढ्या करताच याने अर्जुनास विश्वरुप दाखविले. हा ज्ञानाचा दीप उजळून मी मोठा केला. म्हणून आम्हाला श्रीहरिच गोड आहे. दुसरी कशाचीही चाड नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *