ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.271

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २७१ 

सायुज्य सदनी ज्ञानाचा उद्गार । विज्ञाने अमर पावता हे ॥ साधनबाधन धन गोत वित्त । हरिवीण हित मनीं नाही ॥ मार्गीचा कापडी धरूनियां ओढीं । ईश्वरी उघडीं उडी घाली ॥ ज्ञानदेवा सिद्धी साधन सपूर । कलेवर कापूर मुरालेसे ॥

अर्थ:-

ब्रह ज्ञानाचा परिपाक म्हणजे सायुज्यमुक्ति व विज्ञानाचा परिपाक म्हणजे अमरपणा त्यामुळे पुनर्जन्म निवृत्ति ज्ञानप्राप्तीला केवळ हरिनाम हे कारण आहे.धन, साधन, गोतावळा याबद्दल लोभ असणे हे बाधक आहे.

कारण हरिप्राप्तिवाचून त्याच्या मनात दुसरा विषय नाही.हरिप्राप्तीच्या मार्गातील वारकरी अंतरंग साधनाच्या ओढीमुळे हरिप्राप्तीकरिता वाटेल ते साधन करण्यास उडी घालतो.अशी ही भगवत् प्राप्तीची भरपूर साधने केल्यावर शरीररूपी कापुर हरिस्वरूपांत मिळून जाईल असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *