ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.166

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-६ वे, उपासना अभंग १६६

या अमरामाजीं येखादा वोळगो म्हणे । तरी तो ठावो ठाकितां अति दुस्तरु । भूमंडळीचे राज्य वोळगों म्हणे । तंव तेथे नलभे अवसरू । निसंग होऊनी यति धर्मचाळू म्हणे । तरी भिक्षेसी पडे विचारू । नि:प्रपंच हात टाळ दिंडी । घेऊनियां वोळगे तो हरिहरू रे रे ॥

हरीचे विद्यावंत जालों रे । आम्ही जाऊनि पंढरपुरी राहिलों । कळिकाळाच्या माथां पाय देऊनियां । वैकुंठ भुवनासी गेलो रे रे ॥धृ॥

अष्टांग योगे शरीर दंडं पाहे । तंव कैचे येवढे कष्टसाधन ।
लय लक्ष लावूनि गुरुमंत्र जपो म्हणों । तरी स्थिर नोव्हे अंतःकरण ।
तल्लीन होऊन हरिकथा आयिकों । म्हणे तरी ठायींचेचि बधिर श्रवण ।
उदंड वाचे हरि हरि म्हणतां । फुकासाठी चुके पतन रे रे ॥

चहुं वेदांचे गव्हर धांडोळिता । वेडावली साही दर्शनें ।
शुन्य स्थावर जंगम सर्वत्र व्यापून असणें । जळी स्थळीं काष्ठी पाषाणी सरिसें ।
या दृष्टी पाहाणें ऐसियातें सेविता अविद्या लोपे । मा विश्वास मानिला मनें ॥

जयाचिये वोळगो जातां आडकाठीच नाहीं । भीतरी गेलिया मान पाविजे ।
अरोथें विरोधे समतुल्य देणे । न मगता अमरा होईजे ।
तो क्षणामाजी दे तें न सरे । कल्पकोटी ऐसिया धुरे कां दुऱ्हाविजे ।
ऐसियाचे गांवीचीं सुखवस्तीचे पुरे । मा बहुत काय अनुवादिजे रे रे ।


ऐसा वैकुंठपुरपती पुंडलिकाचिये भक्ती । अमूर्त मूर्तीस आला ।
भक्तां अमरपद देतुसे । अवळिला नामें यमलोक विभांडिला ।
जिह जैसा भाविला । त्या तैसा पालटु दाविला परी ।
अणु एक नाही वेंचला । बापरखुमादेविवरू विठ्ठलु । आम्हां गीतीं गातां जोडला रे रे ॥

अर्थ:-
 स्वर्गातील अमरांना ही त्याची प्राप्ती होणे दुस्तर आहे.पृथ्वीवरिल राजेराजवाड्याना शक्य नाही कारण विषयभोगातुन त्यांना तसा वेळ मिळत नाही.संन्यास घेतला तरी भिक्षेची चिंता असते ते फक्त टाळ दिंडी घेऊनच साधता येते

त्यामुळे तसे आम्ही पंढरीस गेल्याने आम्ही विद्यावंत झालो व कळिकाळाच्या माथ्यावर पाय देऊन वैकुंठाला पोहचलो.अष्टांग योगाचा थकवणारा अटापिटा करुन शरिर दंडित केले. लक्ष लाऊन गुरुमंत्र जपु लागलो तरी अंतःकरण स्थिर झाले नाही. हरिकथा ऐकायला गेलो तर कान बधिर झाले मात्र वाचेने उदंड हरि म्हंटले फुकटात पतन चुकले.

स्थावर जंगम व्यापुन असलेल्या जळी स्थळी काष्टी पाषाणी असलेल्या त्याला पाहियला वेद व सहा शास्त्र ढुंडाळली त्यामुळे दृष्टी मिळाली व अविद्या गेली हा मनाला विश्वास दिला. पण त्याला ओळखायला कसली आडकाठी नाही.विरोधाला समत्युल्य करुन मोठे पद मिळवले. चक्क अमर झालो. ते त्याने क्षणभरात न संपणारे सगळे दिले कल्पकोटी देणाऱ्या गांवात

सुखवस्ती केली. ह्या पेक्षा जास्त काय सांगु. असा तो वैकुंठपती पुंडलिकासाठी सगुण साकार झाला. त्याने यमलोकाला डावलुन भक्तांना अमरपद दिले. ज्या जसा भावला तसा त्याला मिळाला.व त्यासाठी एक अणु ही खर्च झाला नाही. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांना आम्ही गीत गात जोडले असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *