ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.295

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २९५

जिणे देउनी देही निःशंक होईजे । मां मरणे मरण तयासी म्हणिजे ॥१॥
जिणें तें काई मरणें तें काई । जिणे मरणे दोन्ही चोजवेना ॥२॥
सिंधु बुडबुडा क्षणामाजी आटे । सिंधु बुडबुडा कांही ते नाटे ॥३॥
बापरखुमादेविवराच्या पायीं । ज्ञानदेवो पाही मरण जाणे ॥४॥

अर्थ:-

देह असतांनाच देहाच्या ठिकाणचा जीवभाव टाकून देऊन आपण परमात्मरूपच आहोत. असा निःसंदेह बोध होणे यालाच परमार्थ दृष्टीने मरण म्हणतात. परमार्थ दृष्टीने जन्म किंवा मरण हे मुळीच नाहीत.

समुद्रावर भासणारा बुडबुडा एका क्षणामध्ये समुद्ररूप होतो. मग तो समुद्ररूप झालेला बुडबुडा केंव्हाही नाहीसा होत नाही. तद्वत जीव ब्रह्मरूप झाल्यानंतर तो अजरामर होतो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याच्या चरणाच्या ठिकाणी बुडबुड्याप्रमाणे लय पावणे याचे नाव मरण आहे. असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *