ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.403

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४०३

अमृताची क्षीर ब्रह्मांडभुवनीं । पाहाती त्रिभुवनीं नवल झालें ॥१॥ नादबिंबा भेटी झाली कवण्या रीतीं । शुद्ध ब्रह्म ज्योती संचलीसे ॥२॥ प्रकृति पुरुष शिव शक्ती भेद । त्याचे शरीरीं द्वंद्व देह जाणा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे पिंडी शोध घ्यावा । ब्रह्मांडी पाहावा ब्रह्म ठसा ॥४॥

अर्थ:-

सर्व ब्रह्मांडात अमृताच्याक्षीराच्या रुपाने ब्रह्म भरलेले आहे. हे पाहून त्रिभुवनातील सर्व व्यक्तींना नवल वाटते.जीवब्रह्माचे ऐक्य कसे झाले असेल व शुद्ध ब्रह्म सर्व व्यापी आहे. असा अनुभव कसा आला असेल. ज्याच्या अंतःकरणात प्रकृति पुरुष, शिव शक्ती, वगैरे द्वैत आहे. त्याला हे कळणार नाही. म्हणून प्रथम आपण आत्मरुप आहो तसेच जगत ब्रह्मरुप आहे. हा अनुभव सहजच येईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *