३ पितामहः भीष्म

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! भीष्म !!! भाग -३.

देवव्रताने माता गंगेला दिलेल्या वचनानुसार वडिलांना सुखी ठेवण्यासाठी स्वतःच्या सर्व सुखाचा त्याग करणं म्हणजे पितृऋणातुन कांही अंशी मुक्त होण्यासारखं नाही का? धर्मशील भीष्माच्या कर्मकर्तव्यात मातृधर्मानं प्रवेश केला.

दुसर्‍या दिवशी प्रातःकाळी मत्सगंधेला घेऊन परतीच्या प्रवासाला देवव्रत (भीष्म) निघाले. विवाहानंतर मत्स्यगंधाची ‘सत्यवती’ झाली. ब्रम्हचर्य व्रताचं पालन करण्यासाठी देवव्रत भीष्म हस्तीनापुरच्या भूमीपुत्रांना आर्य जीवनशैली देत एकटा फीरुं लागले.

देवव्रताने सत्यवतीला पित्याकडे सोपवले. भीष्माचे हे लोकोत्तर कार्य बघुन प्रसन्न झालेल्या शांतनुने देवव्रताला इच्छामृत्युचे वरदान दिले.

सत्यवतीपासुन महाराज शंतनूला चित्रगंद आणि विचित्रविर्य असे दोन पुत्र झाले. चित्रगंद १६ वर्षाचा झाला नाही तोच शांतनूचे प्राणोक्रमण झाले. चित्रगंद गादीवर बसला, परंतु थोड्याच दिवसात गंधर्वबरोबरच्या युध्दात मारला गेला. विचित्रविर्य लहान असल्यामुळे भीष्मांच्या देखरेखेखाली शासन करुं लागला. भीष्मांना पुनः राज्यव्यवहारात लक्ष घालणे भाग पडले.

भीष्म विचार करुं लागले त्यांच्यातील दोन मनांच्या द्वदांचा. एका मनाला हवं ते सांपडल्याचा समाधान, पित्यासाठी स्वसुखाला तिलांजली दिली हे अलौकीकच नाही काय ? रामाने पित्याच्या आज्ञेनुसार १४ वर्षे वनवास भोगला. परंतु गेलेले ऐश्वर्य परत लाभेल याची खात्री तरी होती, पण भीष्मांच्या बाबतीत तसेही नव्हते. तसं राज्य हे नश्वरच! मनगटाच्या जोरावर मिळवु शकतं.

आणि दुसरं मन ! पित्याचं दुःख नाहीसं करण्यासाठी आजन्म ब्रम्हचर्यव्रत स्विकारण्याची प्रतिज्ञा! शेवटी शरीरधर्म आहेच ना ! वडिलांचच उदाहरण समोर आहे. गंगेच्या विरहानं ते विचारी असुनही सत्यवतीच्या मोहात अडकलेच ना ! प्रजाहितदक्ष, जनकल्याणासाठी क्षण क्षण झिजणारे शरीराने द्रोह केल्यावर शरीरसुखासाठी कर्तव्यच्युत झालेच ना !

तारुण्यात नुकतेच पदार्पण झालेले, वेदाभ्यासी, शस्र-अस्र विद्या निपुन असले आज शरीरात बळ असल्यामुळे आजन्म ब्रम्हश्चर्य व्रत स्विकारण्याची अविवेकी प्रतिज्ञा प्रतिज्ञा केल्यामुळे मनाला जरी समाधान लाभले, कर्तव्य बजावल्याच्या आंनदात आकंठ डुंबले तरी, उद्या शरीर जागृत झाले, त्यालाही भूक असते, जिथे देवाधिदेव इंद्राला अहिल्येचा मोह झालाच ना !

एक दिवस शारीरीक भूकेने पिडीत झालेवर विवेक! सदाचरण, वेदाभ्यास हे सर्व शारीरीक भूकेसमोर स्वाहा होईल आणि केलेली प्रतिज्ञाही! या सर्व उहापोहातुन मनावर विजय मिळवला. निश्चय केला, दुर्वर्तनाला फिरकु देणार नाही, विवेक सोडणार नाही. हयातभर प्रतिज्ञेबरहुकुम वर्तन करुन भीष्म उपाधीला कलंक लागु देणार नाही. आजन्म ब्रम्हश्चर्य व्रताचे पालन करु! दोन्ही मनाचे द्वंद संपले. भीष्मांना पुनः आनंद प्राप्त झाला. मन शांत शांत झाले.

क्रमशः

संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading