२० पितामहः भीष्म

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! भीष्म !!! भाग -२०.

थोर मनाच्या स्थूणापर्णाने शिखंडीवरील संकट टळेपर्यंत स्वतःचं पुरुषत्व प्रसंग निभवल्यावर परत करण्याचे बोलीवर बहाल केलं. शिखंडी एक नवी आशा उराशी कवटाळुन पांचाल नगरीत परतला. हिरण्यवर्माना तो पुरुष असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी क्षमा केली व पांचालनगरीवरचं संकट टळलं.

दिलेला शब्द पाळण्यासाठी घेतलेलं पुरुषत्व परत करण्यासाठी शिखंडी पुनः स्थूणापर्णांकडे गेला. परंतु त्याची काळवंडलेली मुद्रा, म्लान वदन, निस्तेज नेत्र, पाहुन कारण विचारले असतां त्यानी सांगीतले की, दिलेलं दातृत्वच शाप बनला. कुबेराने या अपराधाला शासन म्हणुन हयातभर स्रीत्व नशीबी आलं. कुबेराच्या शापामुळे तुला दिलेलं पुरुषत्व परत घेता येत नाही. ते कायमसाठी तुझ्याकडेच राहिल.

शिखंडी जड अंतःकरणाने परतला. पुरुष बनल्यामुळे नाजुकता जाऊन सौष्ठव्यपुर्ण शरीर बनलं. वेदाभ्यास, शस्रास्र विद्या प्राप्त करण्यासाठी हस्तीनापुरला द्रोणाचार्यांच्या आश्रमांत वास्तव्य केलं. धनुर्विद्या, गदायुध्द, तोमर युध्दात प्राविण्य संपादन केलं. ध्येय एकच समोर होतं भीष्मसंहार !

मार्गशीर्ष महिन्यातील शुध्द पक्षाला दोन्ही पक्षातील सेना समोरासमोर उभे राहिले. भीष्म सज्ज होऊन जीवन संपवण्यापुर्वी निर्गुन निराकाफ तेजस्वीतेला धर्माच्या भात्यात ठेवुन इतका रणदंगा करावा की, देवानं जप करावा.

कौरवसेनेसमोर अर्जुनाने रथ आणला. स्तोत्रपठण आणि कालीमातेच्या दर्शनाने अर्जुनातला साधक कार्यरत झाला. त्याने कृष्णाला उभयसेनेच्या मधे रथ घ्यायला सांगीतला. सैन्यात सर्वातपुढे असलेल्या भीष्मांना अर्जुन आणि कृष्णामधे कांही तरी वाद सुरु असल्याचे जाणवलं. त्यांच्या लक्षात आले की, श्रीकृष्ण अर्जुनाला निश्चितच बोधामृत देत असावा. एवढ्यात युधीष्ठीर युध्दावर जाण्यापुर्वी आज्ञा व आशिर्वाद मागण्यासाठी भीष्माजवळ आला. नंतर भीष्मांच्या शंखातुन दिग्विजयी नाद घुमला आणि दोन्ही सेना एकमेकांवर आदळल्या. तुंबळ लढाई सुरु झाली. भीष्मरथ पांडवसेनेत मुसंडी मारत हाःहाकार करु लागले. ते फारच त्वेषाने पांडवसेनेचा नाश करु लागले. अभिमन्यु भीष्मांना आडवा येऊन दुर्मुख, कृतवर्मा, कृप, शल्य आणि भीष्मांना जखमी केले. या युध्दात विराटपुत्र उत्तर आणि श्र्वेत कामी आले.

दुसर्‍या दिवशी भीष्मांनी पांडवाचा क्रौंचारुणव्यूह फोडला. पांडवसेनेची दाणादाण सुरु झाली तेव्हा अर्जुनाने भीष्मासमोर रथ आणुन त्यांच्या भोवतीचं कवच लिलया फोडत होता. भीमसेनाने भीष्मांवर कडव आक्रमण केलं. सात्यकीं त्यांचा सारथी मारला. अभिमन्युला दुर्योधनासह अनेक योध्यानी घेरलं. त्वेषानं अर्जुनाने कौरव सेनेचा धुव्वा उडवायला सुरुवात केली. हे पाहुन भीष्मांनी युध्द समाप्तीचा शंख फुंकला.

कृष्णाने अर्जुनाला म्हटले “तस्मादुतिष्ठ कौन्तेय युध्दाय कृतमिश्रणः” त्यावर अर्जुन उत्तरला “करिष्षे वचनं तव !” हे ऐकुण स्तब्ध झालेले भीष्म म्हणाले धन्य धन्य अर्जुनाची भक्ती !

क्रमशः

संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading