२ पितामहः भीष्म
!!! भीष्म !!! भाग -२.
गंगा पुर्वीसारखीच चिरतरुण दिसत होती. तीच्या तोंडवळ्यावर गेलेला तो बालक नुकताच तारुण्यात पदार्पण करीत असलेला दिसला. गंगाने त्यांना सांगीतले हा आपला *आठवा पुत्र!* आधीच्या सात पुत्रांची खंत न करतां या *देवव्रताला* सांभाळा. हा आठवा पुत्र देवव्रत आपला सर्व शोक नष्ट करेल. याला वशिष्ठांनी वेद आणि त्याचे सहाही अंग शिकविलीत. बृहस्पती आणि शुक्राचार्यांनी सर्व अस्र शस्रांमधे पारंगत आणि प्रविण केले. आता याला युध्दशास्रातील सुक्ष्मता, राजधर्म, अर्थशास्राचा ज्ञाता, दुर्जेय योध्दा होण्यासाठी भगवान परशुरामाच्या आश्रमी पाठवावं !
हा वसु नामक देवतांमधील “द्यौ” नावाचा नववा वसु असुन महर्षि वशिष्ठांच्या शापाने या जन्मात अवतीर्ण झाला. देवव्रताला सोबत घेऊन शंतनू हस्तीनापुरला आले. त्यांचा उत्साह ओसंडुन जाऊ लागला. हस्तीनापुरच्या कार्यात दोघेही कार्यमग्न झाले. अशातच एके दिवशी उन्मत्त क्षत्रियांचे निर्दालन करणारे कर्मकठोर महापुज्य, नवीन भूमी, नवसमाज निर्माण करणारे भूतलावरचे एकमेव सर्जनहार परशुरामांनी देवव्रताला महेंद्र पर्वतावर पाठवण्याची आज्ञा केली.
महेंद्र पर्वतावर देवव्रत अनेक कष्ट करुन शस्रविद्येचे धडे, परशुविद्या, वायव्य विद्या, अनेक प्रकारचे अस्र, शस्राचे ज्ञानार्जन करीत होते. या काळात त्यांना सहनशीलता आणि कार्यशक्ती मिळाली. प्राणायम आणि प्रणवोपासनेतुन शारीरीक शक्ती प्राप्त झाली. वेदपठणांनी आणि उपनिषदांच्या वैदिक तत्वज्ञानाने नितिशास्र धर्मतत्व प्राप्त झाली. ते देवदत्तांना म्हणाले धनुर्विद्यापेक्षा धर्मचर्चा आणि राजधर्मापेक्षा राजनितित प्राविण्य मिळवावे लागेल.
परशुरामांच्या सानिध्यात सर्व प्रकारची विद्या ग्रहण करुन देवव्रत हस्तीनापुरला प्रवेशले. त्यांनी हस्तीनापुरचा व आजुबाजुचा सर्वांगीन विकास केला. युध्द सामुग्री, त्याचे उत्पादन, रथ गाड्यांचे कारखाने, वस्रोद्योग, कलाकुसर, वास्तुकला, नृत्य-संगीत आणि शस्र शिक्षणाला गती दिली. देवव्रताला उसंत नव्हती. देवव्रताने सर्व जबाबदारी उचलल्यामुळे शंतनूला एकटेपणाची जाणीव व्हायला लागली. पत्नी गंगा जाऊन तप लोटली. हस्तीनापुरच्या राजप्रसादात शंतनुला घर नव्हते.
शंतनूला फार एकटं एकटं व अस्वस्थ वाटत होत म्हणुन थोडा बदल व्हावा या दृष्टीने ते यमुना काठावर आले. तीथे त्यांना अत्यंत मधुर पण उग्र वाटावा असा गंध येऊ लागला. त्यांनी गंध कुठुन येतो त्याचा मागोवा घेत गेले असतां त्यांच्या दृष्टीस एक नावाडी कन्या पडली. अप्रतिम सौंदर्य! सुडौल देह, चपळ पण निर्भय कोळ्याची पुत्री *मत्स्यगंधा* होती.
अनेक वर्षांचे संयमाचे बांध फुटण्याची वेळ आल्यासारखे वाटले. ते नावेतुन तीच्या पित्याकडे येऊन थेट मागणीच घातली. पण त्याने अट घातली की, हिला होणारा पुत्र हस्तीनापुरच्या सिंहासनावर बसेल. तिथुन ते उदास मनःस्थीतीत परतले. ही व्यथा वयाच्या कोणत्याही अवस्थेत पिडीत करते..
देवव्रताने राजसारथ्याला विश्वासात घेऊन पित्याच्या दुःखाचे,उदासीनतेचे, व्यथेचे कारण जाणुन घेतले. आता पितृधर्माचा नवा अध्याय विश्वाला पहायचा होता. देवव्रत सरळ धीवर दाशराज समोर जाऊन पित्यासाठी मागणी घातली. त्याच्या अटीप्रमाणे तीचीच मुलं राजपदावर बसतील. पण धीवरचे समाधान न झाल्याने देवव्रताने यमुनाजल हाती घेऊन “ग्रहतारे, वायु, जलदेवतांच्या साक्षीने प्रतिज्ञा केली की, हा शंतनूपुत्र देवव्रत आजन्म ब्रम्हचारी राहील” आणि हीच *भीष्मप्रतिज्ञा* म्हणुन सर्वश्रृत झाली.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६