!!! भीष्म !!! भाग -१९.
अंबा भीष्मावर संतापुन निघुन गेली. डिवचलेली नागीण, चवताळलेली वाघीण सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. तीचा सूड घेण्याचा मार्ग वेगळाच असणार ! स्रीवर हत्यार उचलायचे नाही अशी प्रतिज्ञा असल्यामुळे युध्दात समोर आली तरी प्रतिकार करु शकणार नव्हते.
अंबेने भीष्मांच्या वधार्थ तिर्थयात्रा सुरु केली. सुडचिंतन करीत नंदाश्रम, उलुकाश्रम, च्यवनाश्रम, ब्रम्हदेवाचे स्थान, प्रयाग, कुरुक्षेत्र, देवांची अरण्ये, भोगवती, कौशिकाश्रम, मांडव्य ऋषींचा आश्रम, दिलीपाश्रमांना भेटी दिल्या. तिच्या खडतर साधना व तपश्चर्येवर प्रसन्न होऊन उमापती शंकरांनी वर दिला की, भीष्माचा वध अंबेकडुन होण्यासाठी पुरुष म्हणुन जन्माला येऊन पुर्वजन्मीच्या स्मृती जागृत असतील. त्याच क्षणी पुर्नजन्मासाठी ऊत्सुक अंबेने जाळुन घेतले.
इकडे पांचालपती दृपदाने खडतर तपश्चर्या करुन शंकराला प्रसन्न करुन भीष्मवधासाठी पुत्राचा वर मागीतला, त्यानुसार अंबेने त्यांच्या घरी शिखंडीने जन्म घेतला. वास्तविक शंकराच्या वराप्रमाणे तीने पुरुष म्हणुन जन्माला यायचे होते पण स्री म्हणुन जन्म झाला. हे सत्य तीच्या आई वडीलांनी जगापासुन लपविले होते. ती वयात आल्यावर तीच्या लग्नासाठी दशार्णदेशाधिपती हिरण्यवर्मा यांची सुस्वरुप सुशील सुंदर सद्वर्तनी मुलगी पसंत केली. ती वडीलांना म्हणाली, “एका मुलीचे दुसर्या मुलीशी लग्न कसं होऊ शकेल ?” त्यावर दृपद म्हणाले भीष्माचार्यावर आमचा राग होता, पण त्यांच्या सदाचरणानी सद्वर्तणी प्रखर तेजस्वी व्यक्तीमत्वासमोर त्यांच्याशी दोन हात करुन निस्तेज बनविण्याचं बळ नव्हतं. त्यांच श्रेष्ठत्व बोचत होतं. नाइलाजाने कठोर तपस्या करुन श्रीशंकराला शरण जाऊन भीष्मांचा पराभव करु शकणारा पुत्र मागीतला.
पण कन्याच जन्माला आली, शंकरानी अभय दिले की, आज जरी कन्या असली तरी यथावकाश लग्नानंतर पुत्रात परिवर्तन होईल म्हणुन विवाहाचा घाट घातला. विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला. पण तीला सर्व तुच्छ वाटत होतं. तीचं एकच
ध्येय होत, पृथ्वीतलावरील एका नरवीराला नामोहरण, भीष्माचार्यांना नष्ट करायचय !
परंतु ध्येय दुरच राहिल आणि नवीन समस्या समोर आली. प्रत्यक्ष पत्नी बनुन आलेल्या स्रीनेच शिखंडी पुरुष नसल्याचा आकांडतांडव करुन सर्व दोष माथी मारुन, कोवळ्या वयाचा सर्वनाश केला असा दोषारोपण करुन दुखावलेल्या नागीणीगत फुत्कारतच पितृगृही निघुन गेली आणि भीष्माचार्या ऐवजी संतापलेले, दुखावलेले भयंकर हिंस्र स्वरुपातील श्वसुर हिरण्यवर्मा समोर उभू राहिलेत.
असे अपमानकारक जीवन व्यतीत करण्यापेक्षा जीवनात काही अर्थ उरलेला नाही ही जाणीव होऊन एके दिवशी कोणालाही न सांगतां राजप्रसाद, मातापिता, वैभव सारं सोडुन अरण्याचा रस्ता धरला. वनामधे ध्यानीमनी नसतांना स्थूणापर्ण नावाचा यक्ष भेटल्यावर त्याला आपली दुर्दैवी कथा ऐकवली.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६
