!!! भीष्म !!! भाग -१८.
युध्दाच्या आदल्या रात्री दोन्ही पक्षातील बलाबलाची चर्चा केली. ज्यांनी सव्वाशे वर्षापुर्वी धनुष्याची प्रत्यंचा सोडली त्या भीष्मांनी प्रत्येक योध्याचं बारकाईने केलेले वर्णन आणि लढाईतील केलेली प्रतवारी ऐकुन सर्व थक्क झाले. त्यांनी सांगीतले प्रत्येक दिवशी दशसहस्र योध्दे मारीन पण समोर शिखंडी आल्यास त्याच्याशी यध्द करणार नाही. ती पुर्वजन्मीची अंबा आहे.
भीष्म आपल्या शिबिरात एकटे पहुडले असता त्यांना एका स्रीचे भयानक आवाजातील खदखदने कानावर आले. ते खदखदण्यातच एवढी भयानकता होती की, शरीराला कंप सुटुन कंठ शुष्क झाल्याचा भास झाला. ओळखीचा आवाज ऐकु आला. तो आवाज अंबाचा होता. ती आपल्या वेदना ऐकवत म्हणाली, “त्यावेळी शाल्व, भीष्म, मुनीवर, प्रत्यक्ष परशुराम या सर्वांनी मला हे सर्व विसरायला सांगीतले, पण अंतःकरणातील आग, सत्तास्पर्धेत जळालेल्या नाजुक भावना, हळव्या मनाची झालेली कुतरओढ, ह्रदयावर झालेला घाव, त्यातुन निघालेल्या वेदना कुणीच समजुन घेतल्या नाहीत. अंबा जळली, जळत राहिली, कालौघात अंबेचं जळण लोक विसरुन गेलेत पण त्यांचा हा गैरसमज होता.”
“भीष्माचार्य, कुरुनंदना, आपण आजन्म ब्रम्हचर्य व्रताची प्रतिज्ञा केल्यामुळे स्रीसहवास लाभला नाही परंतु मातेचं प्रेम थोड कां होईना अनुभवलं. पतीसाठी डोळ्यावर पट्टी बांधुन वावरणारी गांधारी, पांडुपुत्रांना जन्म देण्यासाठी मरणयातना सोसणारी कुंती यांच्या वर्तणुकीतुन अतुलनीय प्रेमाच्या अविष्काराचा साक्षात्कार झाला असेलच. स्रीला त्यागाची आणि प्रेमाची मुर्तीचे रुप मानतात, पण तीचे आणखीही एक रुप असते, चवताळलेल्या वाघीणीचे, दुखावलेली स्री डिवचलेल्या नागीणीपेक्षा, एवढंच काय चवताळलेल्या वाघीणीपेक्षा भयंकर असते.”
“राजन ! आपण स्वयंवर मंडपांत बळाच्या जोरावर हरणं केलं नसतं तर आशा, आकांशा, इच्छासहित शाल्वासारख्या पुरुषाची भार्या म्हणुन वैभवाच्या शिखरावर असती. पण मेरुमंदारासारखा आधार दुष्टपणे हिरावुन इच्छा अपेक्षांना धक्का दिला, एक पतीता बनवुन अनाथ, निराधार करुन जननिंदेचा विषय बनविले. पतीगृह, पितागृहास मुकल्यामुळे अनाथासारखे तब्बल बारा वर्षे वणवण भटकावे लागले.”
“प्रतिशोध घेण्यासाठी सहा सहा मास अन्नाशिवाय खडतर तपश्चर्या केली. मास नी मास एका पायावर उभी राहिली.”
भीष्म म्हणाले, “प्रतिशोधच घ्यायचा होता तर एवढे कष्ट कशाला घेतले ? स्वतःची तलवार देऊन समोर उभा राहिलो असतो, वृथा जीवन मातीमोल करुन कांही साध्य होत नाही असे पाहुन स्वतःला जाळुन जीवनाचा केविलवाणा अंत करुन घेतलास !”
पुढे ते म्हणाले, “इच्छामरणी असल्यामुळे प्राणत्यागाचा संकल्प केल्याशिवाय मृत्यु येऊं शकत नाही.”
त्यावर अंबा म्हणाली, “मी जशी क्षणक्षण जळली, अनाथ पोरकी होऊन भटकली, तशी असाहाय्य अगतीक स्थीती पहायचा क्षण आला आहे. आपली केविलवाणी धडपड पाहणार आहे.” एक भयानक स्वप्न पाहिल्याची जाणीव भीष्मांना झाली.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६
