८ पितामहः भीष्म

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! भीष्म !!! भाग -८.

सत्यवतीने लग्नाआधीचे कुमारी अवस्थेतील व्यासजन्म रहस्य भीष्मासमोर उघड केले. व्यासजन्म ही इश्वरीय व्यवस्थापना होती. सर्वसामान्यांमधे निश्चीतच घटना नव्हती. ती भूतकाळात हरवुन गेली. ती यमुनेच्या पैलतीरावर निर्जनस्थानी मासळी आणण्यासाठी नौका वल्हवित होती, तेवढ्यात हिमालयातुन उग्र साधना करुन विध्यात्याचं कार्य त्यांच्या उरात धगधगत होतं. व्यक्त रुप देण्यासाठी साधन शोधत होते. त्यांना ही विकाररहित बालिका दिसली. त्यांनी धूकं निर्माण केलं. तिकडे पिता आणि इकडे हा तेजस्वी ऋषी! ती सुन्न झाली. जेव्हा ती भानावर आली, धुकं विरलेलं होत. पराशर ऋषींनी तीला आशीर्वाद देत म्हणाले भीऊ नकोस. तुझी मत्स्यगंध त्वचा यापुढे स्वर्गीयगंध उधळेल ! तु अत्यंत रुपसंपन्न कुमारी होशील. तुझ्या उदरीचा जीव या बेटावरच ठेव.

योग्य कालावधीनंतर सत्यवतीने कृष्णर्णीय व्यासांना जन्म दिला. त्यांनी प्रगट होऊन सांगीतले, “संकटसमयी माझे स्मरण केल्याबरोबर प्रगट होऊन संकट निवारण करीन.”

भीष्मांशी चर्चा झाल्यावर तीने व्यासांचे स्मरण करतांच ते तीच्या समोर प्रगटले. ती त्यांची पुजा करीत असता ते तीला म्हणाले, “मातेकडुन कां कोणताही पुत्र पुजा स्विकारीत असतो ?” ती लटक्या रागाने व्यथीत होत म्हणाली, “त्यावेळी अल्लड विकारशुन्य बालिका असल्यामुळे आपल्याला वात्सल्य, प्रेम देऊ शकली नाही.”

व्यासांनी बोलावण्याचे कारण विचारल्यावर सत्यवती म्हणाली, “आपण सर्वज्ञ आहात. तीला जे हवं होतं त्यासाठी सृष्टीधर्म बाजुला सारला गेला. राजा नसला की प्रजेचा नाश होतो, सर्व क्रीया नष्ट होतात. पर्जन्य पडत नाही, देवता अप्रसन्न होतात, राज्यात अराजकता माजते. राजाशिवाय राष्ट सैरभैर होते, म्हणुन माझ्या दोन्ही सुनांना आपल्या शक्तीनं गर्भधारणा करण्यास योग्य करावं!”

त्यांनी सांगीतले की, “एक वर्षाच्या व्रताचे पालन केल्यानंतर दोन्ही सुना शुध्द होतील. विकारविरहित भावनेने माझ्या माध्यमातुन त्या असामान्य जीव जन्मास घालतील. फक्त त्यांनी माझी निरुपता सहन करावी. रक्तवर्णी नेत्र, न शोभणारं जटाबंध! दाढी, अंगाला उग्र गंध, त्वचा रुक्ष, दक्षिणी द्राविडांचा वेश, अशा रुपात सहन करणं महाव्रत आहे.”

ज्यावेळी व्यासांनी भीष्म कक्षेत प्रवेश केला, भीष्मांना सृष्टीनिर्मितीचं तत्वच व्यासांच्या रुपानं कक्षेत आल्याचा भास झाला. त्यांना वाटल परमेश्वर असेल तर हाच असावा. व्यास जर सृष्टीत नसतील तर गुरुत्वशक्ती नसल्यासारखीच आहे ! सर्व व्यवहार ठप्प होतील. व्यास भीष्मांना म्हणाले, “तू या भुलोकीचा धर्म असुन धनुष्याच्या प्रत्यंचेच्या टणत्कारानं सृष्टीतल्या सर्व देवता निमुटपणे भात्यात प्रविष्ट होतील, पराक्रमी शिरोमणी असुनही काती ऋजु आहे, तिर्थयात्रेनं पुनित झालेलं, व्रत निष्ठेनं अत्यंत शिलवान असे माझे बंधु असण्याचा अभिमान आहे.”

भीष्मांनी त्यांची षोडपोचारे यथासांग पुजा केली. व्यासांनी त्यांना नारळपोर्णिमेनिमित्य विश्वबंधु भव म्हणुन नारळ दिले.

क्रमशः

संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading