!!! भीष्म !!! भाग -९.
बंद कक्षामधे व्यास आणि भीष्मांची अति गूढ चर्चा सुरु होती. व्यास म्हणाले, “इश्वर सर्वत्र आहे, आपल्यातही आणि परक्यातही भरलेला आहे. जी भावना आपली तीच दुसर्याची असेल असे समजुन कृतीत आणनं म्हणजे धर्माचरण, सामान्य इच्छा, विकारी, निष्कृष्टही असु शकते म्हणुन उच्च व्यापक सृष्टीतत्वाशी जुळणारी विचारधारा रुजवणं हेच श्रेष्ठ धर्माचरण ! राजधर्मात दास्यतव हा संस्कृतीला अभिषाप आहे.”
भीष्मांनी त्यांना विचारले की, “श्रीनारायण कोणत्या उद्देशाने येत आहेत ?” व्यास उत्तरले, “दास्य विमोचनार्थ ! धर्म रुढीच्या दास्यात जातोय, मानव्य हे अहंकार आणि विकारांच्या दास्यात अडकतय. तत्वज्ञान, बुध्दी शुन्याच्या दास्यात फसतय ! संस्कृती असुरांच्या दास्यग्रहात आहे. त्या निराकारणार्थ येत आहेत. परमेश्वराच्या कृतिवरुन थोडी जरी एकाग्रता भंगली तरी अनर्थ ओढवेल.” एवढ बोलुन व्यास निघाले, त्यांना अंबाच्या कक्षेत जायचय ना !
सत्यवतीने अंबाला व्यवस्थीत सजवले, पण ती भितीग्रस्त होती. आपध्दर्म कळला नाही. तीची काया भुकेली होती, आई व्हायचे होते, राज्याला राजा हवा होता, या सर्व विचारांनी तीचं अंतरंग पेटलं होतं. तिच्या मनांत प्रणयभाव जागृत होऊन मनापेक्षा शरीर पुलकीत झाल्याने व्यासांची उत्सुकतेने वाट बघत राहिली.
व्यासांची उग्र पण अलौकीक तेज फाकणारं रुप तीला सहन न होऊन घट्ट डोळे मिटुन घेतले. व्यासांनी आपले धर्म्यकर्म पुर्ण करुन बाहेर आल्यावर उत्सुकतेने सत्यवतीने विचारताच त्यांनी सांगीतले, “हा मुलगा दशसहस्र हत्तीचं बळ, विद्वान, उत्तम राजा, महाबुध्दीमान आणि वीर्यवान असेल, परंतु मातृदोषामुळे जन्मांध होईल.” योग्यवेळी अंधपुत्र जन्मास आला. राजपदासाठी व्यंग असलेला नृपती चालणार नाही म्हणुन अंबालीकेसाठी व्यासांना पुनश्च पाचारण करण्यात आले.
या कालावधीत अंबालीकेकडुन आवश्यक विधि करण्यास अवधी असुनही कुणी कांही केल नाही की, अंबीकेने धाकट्या बहिणीस तयार केलं नाही. भीष्म तठस्थ होते. त्यांना हा विषय स्वतःस स्पर्शु द्यायचा नव्हता. व्यास अंबालीकाच्या कक्षेत प्रवेशले, त्यांचे उग्र रुप पाहुन ती पांढरीफटक पडली. व्यासांनी आपले कार्य आटोपल्यावर अंबालीकेला म्हणाले “तुझा पुत्र पांढर्या रंगाचा होऊन लोक त्याला पांडु म्हणुन ओळखतील.” सत्यवतीला सांगीतले, “हा पुत्र दैदीप्यमान, सरळ स्वभावाचा, दिग्विजयी, पांढर्या रंगाचा होईल.” योग्य वेळी पांडुचा जन्म झाला. अंध धृतराष्ट पांडुच्या बाललिला सुरु झाल्या.
दोघांपेक्षा निरोगी व चांगला पुत्र व्हावा म्हणुन सत्यवतीने अंबीकेचा होकार घेऊन पुनः व्यासांना बोलावले. अंबीकेने मागील अनुभव लक्षात घेऊन दासीला सजवुन स्वतःऐवजी तीला कक्षात बसविले. व्यास आल्यावर दासीने त्यांची पुजा केली. त्यांना मिटलेल्या डोळ्यापुढे साक्षात धर्मदेव दिसले.
क्रमशः संकलन – मिनाक्षी देशमुख.
भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६
