ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.424
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४२४
नयनाचे अंगणीं तुर्येचा प्रकाश । उन्मनी उल्हास तयावरी ॥१॥ श्वेत शाम कळा प्रकाश आगळा । स्वयं ज्योती बाळा लक्ष लावीं ॥२॥ ज्ञानदेव म्हणे कैसे हे नयन । चैतन्याची खूण आन नाहीं ॥३॥
अर्थ:-
योगी लोकांना ‘तुर्या’ नामक चौथी अवस्था प्राप्त झाली म्हणजे त्यांच्या डोळ्यांत एक प्रकारचे तेज येते व पुढील उन्मनी अवस्थेत मन उल्हासीत होते अशा स्थितीत जिच्या ठिकाणी काळा, पांढरा वगैरे रंग आहेत अशी आत्मज्योती दिसते. तिकडे लक्ष ठेवावे. हे च डोळ्यांतील तेज चैतन्याचे असून दुसरे कांही एक नाही हीच त्याची खूण आहे.असे माऊली ज्ञानदेव सांगतात