ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.989

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके कुट अभंग ९८९

काळें ना सावळे । श्वेत ना पिवळे । नादबिंदाहून वेगळें । तें कवण रे चांगया ॥१॥ ज्ञानदेव म्हणे जाण कां माझे उमाणे ॥धृ॥ गोडा परिस गोड । गगनाहूनि वाड । चौदाभुवनां ज्याची चाड । तें कवण रे चांगया ॥२॥ ज्ञानदेवो मानवलें । माझें मज सांगितलें । दोहींचे मिळोनि एक जालें । भलें केलें चांगया ॥३॥

अर्थ:-
चांगदेवा जे काळे नाही, सांवळे नाही पांढरे नाही, पिवळे नाही नादबिंदु ही नाही त्याच्याहून जे वेगळे असे काय आहे. हे माझे उखाणे तू जाण.जे गोडापेक्षाही गोड, गगनापेक्षा वाड, चौदाही भुवनातल्या जीवाला ज्याची चाड ते काय आहे. तें परमात्मरूप असे चांगदेवाने उत्तर दिले ते माऊलीनी मानले व त्यांना जसे पाहिजे होते तेसे सांगितले. यामुळे जीव परमात्म्याचे तुझ्याठिकाणी ऐक्य झाले आहे. चांगदेवा हे फार चांगले केलेस.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *