वाचावे असे संपूर्ण सूची ” वाचनाचे ३१ फायदे “

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

WACHAVE Ase Sampurn suchi

वाचनाचे फायदे | Benefits of reading | Vachanache Fayade

वाचनाचे फायदे
Benefits of reading
Vachanache Fayade

वाचनाचे फायदे ( Benefits of reading | Vachanache Fayade ):-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगीतलेच आहे की, “वाचल तर वाचल”, म्हणजे तुम्ही वाचन कराल तर तुम्ही आजच्या युगात जगू शकाल. त्यामुळे वाचन ही फार महत्वाची बाब आहे. ज्या व्यक्तीचे वाचन अधिक असते त्याची बुद्धि अधिक प्रगल्भ होते. तर असेच काही वाचनाचे फायदे ( Benefits of reading | Vachanache Fayade ) आहेत ते आज आपण बघणार आहोत.

वाचनाचे फायदे ( Benefits of reading | Vachanache Fayade )
१) ज्ञानात वृद्धी :-
वाचनाने आपल्याला खूप सारी ज्ञान वाढविणारी माहिती मिळते त्यामुळे आपल्या ज्ञानात वृद्धी होते.

२) खरा मित्र :-
वाचन केल्याने पुस्तक आपला खरा मित्र बनतो जो असपल्याला कधीही फसवत नाही तसेच वाईट सल्ले देत नाही व चोवीस तास आपल्या सोबत राहू शकतो.

३) माहितीचा साठा :-
वाचनामुळे आपल्याला भरपूर व नाविन्यपूर्ण व भरपूर माहिती मिळते त्यामुळे आपल्या मेंदूत माहितीचा साठा होतो.

४) चालू घडामोडी :-
वाचनामुळे आपल्या आवती-भोवती, तसेच जिल्ह्यात, राज्यात, देशात व विदेशात सद्या कोणत्या घटना घडत आहेत तसेच काय नवीन होत आहे हे समजते.

हे पण वाचा :- भारतीय संविधान
५) मेंदू सक्षम बनतो :-
वाचनाने आपल्या नवनवीन कल्पना सुचतात, मेंदूला चालना मिळते व आपला मेंदू सक्षम होण्यासही मदत होते.

६) सर्वांगीण विकास :-
वाचनाने आपण सर्व बाजूनी विचार करायला शिकतो कारण आपल्या मानसिक, भावनिक, व्यवहारिक इ. सर्व प्रकारचे वाचन करण्यास मिळते म्हणून सर्वांगीण विकास होण्यास मदत होते.

७) चांगले संस्कार :-
धार्मिक ग्रंथ तसेच समाजसुधार, चांगल्या व्यक्तींची आत्मचरित्रे यामुळे चांगले संस्कार होण्यास मदत होते.

८) समजूतदारपणा :-
वाचनामुळे आपण कोणाशी कसे बोलले पाहिजे, कसे वागले पाहिजे याविषयी एक संकेत मिळतो. थोर व्यक्तींनी कश्या समजूतदार पद्धतींनी आपले कार्य केले यावरून देखील आपल्यात समजूतदारपणा येतो.

९) हजरजबाबीपणा :-
वाचनामुळे आपल्याला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याची क्षमता आपोआपच विकसित होते. कारण प्रत्यक्ष प्रश्नाचे उत्तर देण्याची क्षमता आपल्याला वाचनातून मिळते त्यामुळे आपल्यात हजरजबाबीपणा आलेला असतो.

१०) सारासार विचार :-
वाचनामुळे आपली विचार करण्याची शक्ती प्रगलब झालेली असते. त्यामुळे आपण कोणताही निर्णय सारासार विचार करून घेऊ शकतो.

११) संयम शिकतो :-
प्रत्यक्ष व्यक्तीमध्ये राग ही भावना असतेच परंतु आपल्याला त्यावर संयम कसा मिळवावा हे सुचत नाही परंतु वाचनाने त्या व्यक्तीची कोणत्याही गोष्टीवर विचार करण्याची शक्ती वाढलेली असते व तो विचार करून बोलतो प्रत्येक गोष्टीला पोसिटीव्हली घेऊन विचार करतो व आपल्या मनावर ताबा मिळवतो मनावर ताबा मिळवला की आपोआपच त्यात संयम येतो.

१२) विचारकौशल्य :-
वाचनामुळे विचार करण्याची क्षमता वाढते व सर्व बाजूनी विचार करू शकतो त्यामुळे त्याचे विचार कौशल विकसित होते.

१३) संवादकौशल्य :-
व्यक्ती म्हटला म्हणजे तो एक समाजशील प्राणी आहे व त्याला समाजात राहणे आलेच म्हणजे त्याला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांशी संवाद साधवाच लागतो. हा संवाद चांगला व्हावा यासाठी त्याच्याकडे बोलण्याचे तारतम्य असावे नाही तर ध चा मा व्हायला वेळ लागत नाही हे संवाद कौशय वाचनातून विकसित करता येते.

१४) बुद्धी विकास :-
बुद्धी हे एक रिकाम्या खोक्या सारखे असते त्यात चांगले विचार गेले तर चांगले होते व वाईट विचार गेले तर वाईट त्यामध्ये हे चांगले विचार भरण्याचे काम आपण चांगली पुस्तके वाचून साध्य करू शकतो.

१५) स्मरणशक्ती :-
स्मरण शक्ती वाढवण्यासाठी वाचन हे एका शस्त्रा प्रमाणे काम करते. त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल.

हे पण वाचा :- मराठी बोधकथा
१६) सकारात्मक विचार :-
आपल्या आजूबाजूला खूप नकारात्मक विचाराचे लोक फिरत असतात त्याचाच प्रभाव आपल्यावर पडण्याची शक्यता असते. परंतु आपण बाहेर जाणे तर थांबवू शकत नाही मग सकारात्म विचाराची पुस्तके वाचून ते नकारात्मक विचार कमी करू शकतो.

१७) योग्य अयोग्य समज :-
कोणती गोष्ट योग्य व कोणती अयोग्य याचा निर्णय करण्यात प्रत्येक व्यक्ती गुरफटळेल असतो. हाच निर्णय घेण्यासाठी आपल्याला वाचनाची मदत होते. त्यामुळे योग्य अयोग्य याची समज होते.

१८) शब्दकोश वाढतो :-
कोणतीही भाषा सहज व प्रभावी वापरासाठी आपल्याकडे सर्वात अगोदर त्या भाषेची शब्द संपत्ती असणे आवश्यक असते. व शब्द संपत्ती वाढवण्याचे काम वाचनामुळे सहज शक्य होते.

१९) चांगले आकलन :-
वाचनामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीचे आकलन उत्तम होते.

२०) भावनिक विकास :-
कथा, कादंबऱ्या वाचनाने आपल्याला प्रत्येक पात्राची तस वागण्यामागाची भावना आपल्याला कळते व यातून देखील आपण आपला भावनिक विकास करू शकतो.

२१) समयसूचकता :-
कोणता निर्णय केव्हा व कोणत्या वेळी घ्यावा याला फार महत्व असते परंतु आपण नेमके तेव्हाच चूक करतो ही चूक व्हायला नको यासाठी आपल्याकडे समय सुचकता असणे गरजेचे आहे. ही समयसुचकता आपण वाचनातून साध्य करू शकतो.

२२) आत्मविश्वास :-
आत्मविश्वास ही फार महत्वाची बाब आहे. बऱ्याचदा आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसते आपल्याला तेच काम मिळाले की आपला आत्मविश्वास डगमगतो. वाचनामुळे आपल्याला स्वतःवर विश्वास निर्माण होतो.

२३) मेंदूचा व्यायाम :-
मेंदूचा व्यायाम होणे फार गरजेचे असते. असे म्हणतात की, “खाली दिमाग शैतान का घर” हे खरंच आहे कारण तेव्हा माणसाच्या डोक्यात नको असलेले विचारच जास्त येतात. त्यावर एकाच उपाय रिकाम्या वेळेत वाचन करणे. ज्यामुळे आपले ज्ञानही वाढते व वेळही छान जातो.

२४) एकाग्रता वाढते :-
मनाच्या एकाग्रतेसाठी तुम्हाला आवडणाऱ्या विषयाची पुस्तके वाचावीत मग ती गोष्ट, कथा, कादंबरी, कविता जी असतील ती पण ती तुम्हाला आवडणारी असावीत.

२५) कल्पकता वाढले :-
आज पर्यंत जे काही शोध लागले असतील किंवा साहित्य लिहिले गेले असेल ते दुसऱ्या कोणाच्या तरी गोष्टीवरून प्रेरित होऊनच झालेले आहेत. आपण पण असेच वाचन केल्यास नक्कीच काहीतरी नवीन निर्माण करू शक्ती थोडक्यात आपली कल्पकता वाढवू शकतो.

२६) व्यक्तिमत्व विकास :-
वाचनाने आपण नक्कीच आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो.

२७) छंदाची जोपासना :-
प्रत्यक्ष व्यक्तीला काहींना काही छंद असतो. हो प्रत्येकाला तो छंद जोपासण्यास वेळ मिळत नाही परंतु वाचन हा एक असा छंद आहे की तो घरी, प्रवासात किंवा कुठेही जोपासू शकतो त्यासाठी आपल्याला आपल्या जास्त साहित्यांची गरज नसते. व ते साहित्य सहज कुठेही पिशवीत घेऊन शकतो.

२८) ताण-तणाव कमी :-
आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्तीच्या मेंदू व मनावर ताण असतो हा ताण कमी करण्याचळे काम वाचन नक्कीच करेल.

२९) वेळेचा सदुपयोग :-
काही लोकांना वेळ पुरत नाही व नुसतेच बसून कंटाळतात. जसे कोरोना काळातील लॉकडाऊन. असे म्हणतात की, “खाली दिमाग शैतान का घर” हे खरंच आहे कारण तेव्हा माणसाच्या डोक्यात नको असलेले विचारच जास्त येतात. त्यावर एकाच उपाय रिकाम्या वेळेत वाचन करणे. ज्यामुळे आपले ज्ञानही वाढते व वेळही छान जातो. तसेच वेळेचा सदुपयोगही होतो.

३०) एकलकोंडेपणा घालवण्यासाठी :-
प्रवासात, नवीन ठिकाणी गेल्यास किंवा घरी कोणी नसल्यास आपल्याला एकलकोंडेपणा वाटतो अशावेळी वाचन केल्यास तुमचा एकलकोंडेपणा घालवता येईल.

३१) यशस्वी होण्यासाठी :-
कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला जायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला परीक्षा ह्या अनिवार्य असतात. त्या परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला वाचन करावेच लागते.
हे पण वाचा :- मराठी दिनविशेष
नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp Telegram Facebook Twitter

प्रेरणादायी व सामाजिक विषयाचे वाचनीय लेख

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *