3 वाचावे असे चला ज्योत जिवंत ठेवूया… ” संघटनेत उर्जा प्राप्त होते. “

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

” संघटनेत उर्जा प्राप्त होते. “

एका छोट्याशा गावात दहा बारा घर होती. सर्वजण एकमेकांना ओळखत होते. दर रविवारी ते सर्वजण गावातील मंदिरात एकमेकांना भेटत. नाही भेटल तर त्यांना चैन पडत नसे. त्यात लहान मोठी सगळी बाया बापडे, मूले, मूली, तर काही एकटी माणसे असे सर्वजण आनंदाने येत होती…

एक मध्यमवयीन एकटा रहाणारा माणूस या मंदिरात नियमित येत होता. सर्व कार्यक्रमात त्याचा हिरीरीने सहभाग असायचा. त्याची उपस्थिती सर्वांसाठी आनंददायक असायची…
मात्र मागील दोन रविवार पासून या नियमितपणे हजर राहणाऱ्या माणसाने, कोणतीही सूचना न देता, भाग घेणे बंद केले…

त्याची वाट पाहून काही आठवड्यांनंतर, गावातील वृद्ध सरपंचाने त्यांच्या घरी जाऊन कारण शोधण्याचे ठरवले…

एका हिवाळ्याच्या गारठलेल्या संध्याकाळी सरपंच त्या माणसाच्या घरी गेले…

त्या माणसाने शेकोटी पेटवली होती आणी थंडीत उब मिळण्यासाठी तो एकटाच शांतपणे बसला होता…

त्या माणसाने सरपंचाचे स्वागत केले. त्यांच्यात फार काही संवाद झाला नाही. नुसते अभिवादन फक्त. त्यांच्या मूक संवादापेक्षा शेकोटीत जळणाऱ्या लाकडांचा आवाज जास्त होता. दोघेही शेकोटीच्या ज्वालेकडे शांतपणे बघत बसले होते…

काही मिनिटांनंतर सरपंच उठले, त्यांनी त्या शेकोटीमधील एक मोठी लाकडाची जाळणारी फांदी, शेकोटीतून बाजूला काढली आणी परत जागेवर येऊन बसले…

तो माणूस हे सर्व निर्विकारपणे पहात होता. थोड्या वेळात त्या बाजूला काढलेल्या लाकडाच्या फांदीतील ज्वाळा कमी झाली. अगदी विझलेल्या अवस्थेत आल्यानंतर ती फांदी अगदी काळी दिसू लागली. थोड्या वेळापूर्वी प्रकाशमान तेजस्वी असणाऱ्या त्या लाकडात आता काहीही उरले नव्हते. तो एक निर्जीव काळा लाकडाचा तुकडा उरला होता…

अजूनही दोन्ही व्यक्तीमध्ये काहीच संवाद झाला नव्हता. निघण्याची तयारी करण्यापूर्वी, सरपंचानी तो लाकडाचा निरुपयोगी तुकडा उचलला आणि पुन्हा आगीच्या मध्यभागी ठेवला…

ताबडतोब, तो लाकडाचा तुकडा पुन्हा जागृत झाला, पुन्हा तो तेजस्वी दिसू लागला व जळू लागला…

आता सरपंच ऊठले आणि दारात पोहोचले, तेव्हा तो माणूस म्हणाला : तुमच्या येण्याबद्दल आणि तुमच्या सुंदर शिकवणीसाठी धन्यवाद. मी लवकरच मंदिरात परत येईन…

आपल्या जीवनात ग्रुप, समुदाय का महत्वाचा आहे…

कारण मागे राहिलेला प्रत्येक अविकसित सदस्य, बाकीच्या मित्रांकडून उर्जा, तेज घेतो…

ग्रुपचे सर्व सदस्य हे एकत्र ऊर्जेचा, ज्वालेचा भाग आहेत याची जाणीव असणे हे खूप महत्वाचे आहे…

हे लक्षात ठेवणे देखील महत्वाचे आणी धीर देणारे आहे कि आपण सर्वजण एकमेकांची ज्योत तेजस्वी ठेवण्यास जबाबदार आहोत…

ग्रुप देखील एक कुटूंब आहे.
कधीकधी आपण काही ,भांडणे आणि गैरसमजांनी कंटाळलो तरी हरकत नाही. एकमेकांशी संपर्क असणे महत्वाचे आहे…

आपण येथे भेटण्यासाठी, संदेश देण्यासाठी, शिकण्यासाठी, कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी आहोत आणी आपल्यापैकी णीच एकटे नसल्याचे जाणून घेण्यासाठी येथे आहोत…

~
चला ज्योत जिवंत ठेवूया…🙏🌹

समजून घ्यावे असे……

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *