ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.949
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके घोंगडी अभंग ९४९
निरंजना गाई चारुं गेलों । तंव चवाळें तेथें एक पावलों ॥१॥ मज निर्गुणें आड वारिलें । चवाळे हिरोनि जिणें बुडविलें ॥२॥ बापरखुमादेविवरें इतुकें केलें । माझें चवाळें हिरोनि नेलें गे माय ॥३॥
अर्थ:-
निरंजन परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी इंद्रियेरूपी गाय चारू गेलो असता तेथे एक निर्गुण घोंगडे प्राप्त झाले. त्याच स्थितीत निर्गुण घोंगडे घेण्यासहि म्हणजे निर्गुणभाव परत करण्यासहि प्रतिबंध होऊन निर्गुणभावाचे घोंगडे हिरून घेतले म्हणजे निर्गुणभावहि काढून टाकला. आणि माझे जीवित्व बुडविले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल यांनी माझे घोंगडे हिसकवुन घेतले. एवढे काम केलें. असे माऊली सांगतात.