ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.604
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०४
अवघ्या बाहीं म्यां व्योम कवळिलें । अवघ्या हृदयीं अरुप धरिलें ॥१॥ अवघेपणे मी त्याचीच जालें । तेंचि पावलें तदाकारें ॥२॥ कांही नसोनिया कांहीं एक जाला । अवघाचि शोखिला ब्रह्मरसु ॥३॥ रखुमादेविवरु अवघाचि धरिला । अवघाचि गिळिला अवधेपणें ॥४॥
अर्थ:-
माझ्या बाहुनी ते निराकार आकाशरुपी ब्रह्म मी कवळिले. आणि तेच रुप हृदयात धरुन ठेवले. सर्व प्रकाराने मी त्याचीच झाले. ब्रह्मरुप झाले.कांही एक न होता मी तद्रूप होऊन ब्रह्मरस सेवन केला. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, त्यांना मी पूर्ण स्वाधीन केल्यामुळे वेगळा ठेवला नाही. असे माऊली सांगतात.