ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.439

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४३९

सत्त्व रज तम त्रिगुण ते ब्रह्म । अर्धमात्रा निस्सीम ॐकार हा ॥१॥ सहज हा प्रणव सर्वातीत साजे । मीपणास तेथ ठाव नाहीं ॥२॥ अक्षर कूटस्थ सर्वातीत असे । अक्षर अविनाश ऐसें जाणा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे सर्वांचे शेवटीं । अविनाश दृष्टि असे की रे ॥४॥

अर्थ:-

ते ब्रह्मच सत्त्व, रज, तम असे त्रिगुणात्मक जगत बनते. अर्धमात्रा ॐकार स्वरूपच आहे. तेथे अहंकार जाऊ शकत नाही. असा प्रणवरूप ॐकार सहजच सर्व वस्तुहून पलीकडचा ठरतो. या ॐ कारालाच नाश नसल्यामुळे अक्षर असे म्हणतात. निर्विकार असल्यामुळे त्यालाच कूटस्थ व सर्वातीत असे म्हणतात. ते अक्षरच अविनाश आहे असे समजा. सर्वांचे शेवटी आत्म स्वरूप पाहावयाचे ती दृष्टीही अविनाश आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *