ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.929
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके अंबुला अभंग ९२९
अवचित परवडी जालिये अंबुलिया । लाजिले आपुलिया सकळ गोता ॥१॥ एकांतीचे सुख भोगी आपुलिया सरिसी । दोहींची सरसी गती झाली ॥२॥ बापरखुमादेविवर विठ्ठला लाधला । मज घेउनी गेला बाईये वो ॥३॥
अर्थ:-
एक गौळण म्हणते आत्मतत्त्वरूप श्रीकृष्णाची गाठ एकाएकी पडल्यामुळे मला सर्व आप्तेष्टांची लाज वाटली. मी याच्याबरोबर एकांतात आत्मसुख भोगीत असतांना मी माझेपणाला विसरून गेले. माझे पिता व रखुमाईचा पती जे श्रीविठ्ठलरूप आत्मतत्त्वाची गाठ असल्यामुळे ते माझ्या ठिकाणचा माझेपणाच घेऊन गेले असे माऊली सांगतात.