ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.605

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०५

तनु चोरिली कोठे मी पाहों । भूक लागली काय मी खावों ॥१॥ पाहाणें नाहीं काय पाहों । ध्येय नाही काय ध्यावों । भिंत नाहीं काय चित्र लिहो । चित्र सरलिया तया नाहीं ठावो जी देवा ॥३॥ निवृत्तिदास म्हणे कैसे हो काई । रखुमादेविवरा विठ्ठला ध्यायीं ॥४॥

अर्थ:-

मी ब्रह्मरुप झाल्यामुळे माझा देहभाव नष्ट झाला. नंतर त्याला पहावयास गेलो असता आता तो कोठे आहे ? भूक लागली तर खाण्याला पदार्थ आहेत कोठे? या स्वरुपाच्या ठिकाणी पाहाणेपणाच नाही तेथे काय पाहावे? व जेथे ध्येयत्व नाही. तेथे काय ध्यावे? भिंत नाही तेथे चित्र कसे काढावे? चित्र जर नष्ट झाले तर त्याला ठिकाण कोठे आहे? त्याप्रमाणे जगतरुपी चित्र काढण्याला मायारुपी भिंत पाहिजे. पण ती मायाच ज्ञानाने निवृत्त झाल्यामुळे तिच्यावर काढले जाणारे चित्र म्हणजे जगत याची प्रतिती येईल कशी? निवृत्तीनाथ म्हणतात मला जर कोणी विचारेल की, ही स्थिती प्राप्त होण्याला काय केले पाहिजे? तर मी त्याना असे सांगेन की तुम्ही रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचे ध्यान करा. असे माऊली सांगतात

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *