ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.981

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके  कुट अभंग ९८१

मज स्वप्न लेवविला शृंगारू । माझे उदरी जन्मला भ्रतारू ॥१॥ जागि सुति ना मी निदसुरी । चोळी सुदली तोडूनि गळसरी ॥२॥ लक्षण म्हणे की सुलक्षण म्हणे । येके उदरींच आम्ही दोघे जणे ॥३॥ सोइरीक पडिपाडे समसाटी । मी वो बैसलें तयाचे पाठी ॥४॥ निपट कैसें आहेवपण । कैवल्या आधी तेल कांकण ॥५॥ निवृत्ति दास तेथें नाहीं । लग्नमुहूर्त बहुला ठायीं ॥६॥

अर्थ:-
माया म्हणते स्वप्नवत् असलेले जगरूपी अलंकार पुढीलप्रमाणे लेवविला. ब्रह्मस्वरूपांचे ठिकाणी शुद्धसत्त्वप्रधान मायेचा स्वीकार करून तिच्यात प्रतिबिंबीत झालेल्याला ईश्वर संज्ञा आली. नंतर ती माया त्याचे आधीन राहिल्यामुळे तो ईश्वर तिचा पती झाला. ती जागी नाही व झोपलेली नाही. म्हणजे तिला स्वस्वरूपाचे ज्ञान व अज्ञानही नाही. अशा अवस्थेमध्ये तिची गळसरी तोडली म्हणजे शुद्धसत्त्वप्रधानता काढून ‘चोळी सुदली’ म्हणजे आवरणात्मक शक्तीचा स्विकार करून, जगतरूपी अलंकार धारण केला.हे चांगले झाले कां वाईट झाले । तात्त्विक आम्ही दोघे मायेश्वर एके उदरी म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्त आहोत.आम्ही दोघे पडिपाडे म्हणजे समसत्ताक असल्यामुळे या लग्नाच्या सोयरीकतेने आमची बरोबरी झाली.म्हणून मी त्यांचे पाठीवर बसलें वास्तविक माझे अहेवपण नित्य असतांना लग्न सभारंभात केळवण होण्याच्या पूर्वीच मला सूक्ष्म जगतरूपी तेल लावून हातांत चबांगड्या भरल्या. ‘बहुला ठायी, म्हणजे ब्रह्माचे ठिकाणी ईश्वर मायेचे लग्न मुहुर्तावर लागले परंतु मी तेथ नाही म्हणजे लग्न भानगडीत नाही. कारण मूळचाच मी शुद्ध आहे. असे

निवृत्तीदास माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *