ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.222

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २२२

संसारा येऊनी लागले फांसे । गुंतला आशा मायामोहे ॥ नखंडे न तटे कर्माची बेडी । अनुभवेवीण तोडीता योगिया ॥ कर्माची साखळी पडली असे पायी । गुरुमुखें खुणे उगऊं पाही ॥ ज्ञानदेवो म्हणे तुझे कृपेवीण न तुटे फांसा । निवृत्तीने कसा उगावला ॥

अर्थ:-

संसारांच्या फासात अडकलेल्या मनुष्याला आशा व मायामोह अजुन बध्द करतो. त्या संसाररुपी कर्माची बेडी तुझ्या पायात पडली आहे. व ती तोडण्याठी योग्यांना अनुभवाची गरज नाही पण आपण अनुभवसंपन्न श्रीगुरुना शरण जाऊन त्यांच्या मुखातून आत्मज्ञानाच्या उपदेशाची खूण ऐकून ती बेडी काढून टाकली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे श्रीगुरु निवृत्तीराया आपले कृपेशिवाय हा संसाराचा फांसा तुटणार कसा? पण आपल्या कृपेने आपण मला पार पाडलेत. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *