ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.950

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके घोंगडी  अभंग ९५०

ब्रह्माचा गोंडा चहूं पावला । मन पांघुरे उमप भावा ॥१॥ चौ हातांहून आगळें । द्विकारांहूनि वेगळे गे माये ॥२॥ बापरखुमादेविवरें सुभटे । मज चवाळे दिधलें गोमटें गे माये ॥३॥

अर्थ:-
या घोंगड्याला ब्रह्मज्ञानाचा गोंडा लावला असून तो चवथ्या पुरूषार्थाला कारण झाला. त्यामुळे अमर्यादित भावाने भटकणाऱ्या मनाला पांघरविले आहे. ते चार हाताहून अधिक आहे म्हणजे चतुर्भुज विष्णुहून वेगळे आहे. तसेच दोन हातांच्या मानवाहून ही वेगळे आहे. अशा तऱ्हेचे हे सुंदर घोंगडे रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याने मला पांघरण्यास दिले. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *