ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.498

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ४९८

विक्षेपतां नाना उठती कल्पना । पासूनियां जाणा शूद्ध जावें ॥१॥ तरीच तें ज्ञान हृदयीं ठसावें । नातरी आघवें व्यर्थ होय ॥२॥ अमृताचें कुंभ सायासें जोडलें । त्यामाजी घातले विष जैसें ॥३॥ मन हे विटाळ अखंड चंचळ । न राहे चपळ एके ठायीं ॥४॥ ज्ञानदेव म्हणे गुरूकृपा होतां । लाहिजे तत्त्वता ब्रह्मसुख ॥५॥

अर्थ:-

चित्तांत अनेक प्रकारचे विक्षेप कल्पना उत्पन्न होत असतात ते सर्व टाकून देऊन चित्त शुद्ध करून घेतले पाहिजे. तरच जीवब्रह्मैक्यज्ञान अंतःकरणांत ठसावेल, नाही तर सर्व फुकट आहे. जसे कष्ट करून मिळविलेल्या अमृताने भरलेल्या घागरीत विषमिश्रण केले असता ते अमृत निरुपयोगी होते. एके ठिकाणी न राहणारे अत्यंत चपळ, चंचल असलेले अशुद्ध मन त्याचा शुद्ध परमात्म पाशा सबंध होणे विटाळ आहे. ते ब्रह्मसुख गुरूकृपा झाली म्हणजे सहज प्राप्त होते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *