ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 584

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-३रे, श्रीनिवृत्ती व श्रीज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५८४

खळेदान देसी भोक्तया सांपडे । ऐसें तुवा चोखडें रूप केलें ॥१॥ ज्ञान तेंचि धन ज्ञान तेंचि धान्य । जाले रे कारण ज्ञानदेवा ॥२॥ तळवटी पाहे तंव रचिले दान अपार । वेदवक्ते साचार बुझावले ॥३॥ साचार आठ रे भासासी । उपरती भूसि निवडली ॥४॥ मोक्ष मुक्ति फुका लाविली तुवां दिठी । तुझा तूं शेवटी निवडलासी ॥५॥ निवृत्ति प्रमाण केलें तुवां ज्ञाना । ब्रह्मीब्रह्म अगम्या रातलासी ॥६॥

अर्थ:-

खळेदान (खळ्यात सांडलेले धान्य गरिहांना उचलायला देतात)दिल्यावर शेतकऱ्याच्या दृष्टीने त्यांत विशेष कांही नसले तरी गरीब लोक त्यातून धान्य निवडून काढून आपला चरितार्थ सुखाने चालवितात. त्याप्रमाणे मी सहज केलेल्या उपदेशातील वाच्यभाग टाकून लक्ष्यभाग जो शुद्ध आत्मस्वरूप ते प्राप्त करून घेतले.अरे आत्मतत्त्वाच्या दृष्टीने विचार केला तर तुझ्या ठिकाणी धन धान्य सर्व आत्मरूपच झाले आहे. तळवटी म्हणजे सर्व प्रपंचाचे अधिष्ठान परमात्मस्वरूपाचे ठिकाणी, परमात्म दृष्टीने पाहीले तर त्याचे ज्ञान लोकांना देणे हे अपार दान आहे. ही गोष्ट सत्यत्वाने वेदवेत्त्यांनाच पटणार. प्रपंचरूप भुसामध्ये षट्शास्त्रे चार वेद व अठरा पुराणे यांच्यातील कर्म उपासना भाग हे भूसकट टाकून देऊन त्यातील मुक्ती हे धान्य आमच्या सांगण्याप्रमाणे तुझे तुच निवडुन घेतलेस व ते लोकांना फुकटच दिली. निवृत्तिनाथ म्हणतात हे ज्ञानदेवा, असे हे सर्व शास्त्रांचे मंथन करून तु ज्ञान संपादन केलेस.त्यामुळे माझ्या सांगण्याला प्रामाण्य लाभले. असा तूं अगम्य ब्रह्मस्वरुपाच्या ठिकाणी रममाण झालास हे तूं फार चांगले केलेस. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *