ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.762
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७६२
ब्रह्माची पुतळी मीचि पैं जालों । ब्रह्मचि लेईलों अंजन गे माय ॥१॥ ब्रह्मचि सुख ब्रह्मपदीं पावलों । ब्रह्मसुखीं निवालों निजीं निज देखा ॥२॥ बापरखुमादेविवरु ब्रह्मपदीं सामावला । मजसहित घेउनी गेला निजपुटीं ॥३॥
अर्थ:-
पुतळी म्हणजे माझे शरीर ब्रह्मरुपच झाले. डोळ्यामध्ये ब्रह्माचेच अंजन घातले आहे. ब्रह्म हेच सुख आहे त्याठिकाणी प्राप्त झालो अंतःकरणाने ब्रह्मसुखाच्या ठिकाणी शांत झालो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हाच ब्रह्म असून त्याच्या पदाच्या ठिकाणी मी ऐक्य पावलो. व माझेपणा सहवर्तमान तो आपल्या स्वरूपांत मला घेऊन गेला. असे माऊली सांगतात.