ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.649

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६४९

निर्गुणाची छाया सगुणी बिंबली । तत्त्वीं तत्त्वें गेली अनुठायां ॥१॥ निश्चळीं निश्चळ नलगे अळुमाळ । तत्त्वता अढळ तें वेगळेचि ॥२॥ नातळतां पंथी शब्दाचा सुहावा । परेसहित दोहावा भरला दिसे ॥३॥ ज्ञानदेवीं रम्य दिसोनी न दिसे । निराकारीं भासे तदाकार ॥४॥

अर्थ:-

निर्गुण स्वरूपाचे प्रतिबिंब सगुणांत आहे. ते सगुणातील प्रतिबिंब श्रीगुरूकृपेने निर्गुण तत्त्वांत एकरूप होते. त्यावेळी तें निश्चल तत्त्वांत निश्चळ असलेले दिसले तरी त्याला अळुमाळ यत्किचीतही संबंध लागत नाही. चल किंवा निश्चल याहून तो परमात्मा तत्त्वतः वेगळा असून अढळ आहे. शब्दाच्या सहाय्याने जे वेदवाक्याच्या सहाय्याने त्याचा पत्ता लागत नाही. परावाणीसहित तो जात व्याप्त आहे. माझे ठिकाणी तें अपरोक्षत्वाने असून दृश्यत्वाने दिसत नाही. परंतु निराकाररूपाने त्याचे अंतःकरणांत सहजच भान होते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *