ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.962

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

अभंग ९६२

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके पांगुळ अभंग ९६२

धर्म अर्थ काम मोक्ष दान मागे श्रीगुरू । हस्त पाद शरीर व्यथा पंगु झालों मी पुढारू ।
तिमिर आलें पुढें मायामोहो उदारू । तेणें मी जात होतों मग सहज भेटला सद्गुरू ॥१॥

धर्म जागो सद्गुरू महिमा जेणें तुटे भवव्यथा । हाचि धर्म अर्थ काम येर तें मी नेघे वृथा ॥धृ॥

एक नाम राम कृष्ण याचें दान देई सद्गुरू । वेदशास्त्र मंथन केलें परी नव्हेचि पुढारू ।
शरण आलों निवृत्तिराया तोडीं माया संसारू । पाहतां इये त्रिभुवनीं तुजहुनी नाही उदारू ॥२॥

ज्ञानेसहित विज्ञान गिळी मी माझे पांगुळ । वृत्ति हे माझे ठायीं हृदयीं बुझे गोपाळ ।
शंख चक्र पद्म गदा तुष्टें ऐसा तूं दयाळ । बापरखुमादेविवरें दान देऊनि केलें अढळ ॥३॥

अर्थ:-
धर्म अर्थ काम व मोक्ष हे चार पुरूषार्थ श्रीगुरूंना दान म्हणून मागावेत हात पाय शरीर इत्यादिकांच्या मागे संसारदुःखाच्या व्यथा असल्यामुळे मला पंगुत्व आले.म्हणजे काही एक हालचाल करता येईनासी झाली. तसेच अज्ञानाचे पडळ दृष्टिवर आल्यामुळे मी मायामोहामध्ये सापडलो अशा मायामोहांत कित्येक जन्मच्याजन्म मी चालत होतो.

असा मी चालत असता माझ्या पूर्व पुण्याईमुळे वाटेत उदार असे सद्गुरू मला भेटले. त्या उदार सद्गुरूंचा ज्ञानरूपी धर्म त्याची जागृति सतत राहून, संसार व्यथा नष्ट करणाऱ्या सद्गुरूंच्या, महात्म्यांचा जयजयकार असो.सद्गुरूंनी दिलेला तो ज्ञान धर्म, त्या मोक्ष धर्माव्यतिरिक्त धर्म, अर्थ काम हे पुरूषार्थ जर कोणी मला फुकट दिले तरी ते मी घेणार नाही. कारण ते तुच्छ आहे. वेदांतशास्त्रांनी विचारांनी मंथन करून ज्या भगवान श्रीकृष्णाच्या नावांचा महिमा गायलेला आहे त्या श्रीकृष्णाच्या नामाचेच मला दान करा म्हणजे झाले.

एवढे दान मी श्रीगुरूनिवृत्तीरायांना शरण जाऊन मागत आहे. त्या नामाच्या दानाने मायेचा संबंध तोडून टाका. एवढी भीक देण्यास सर्व त्रैलोक्यांत तुमच्या इतका उदार कोणी नाही. आपल्या ज्ञानाने वृत्तीत उत्पन्न होणारें जें परमात्मज्ञान तें आणि प्रपंचज्ञान ही दोन्ही माझ्या पांगळ्याची नाहीशी करून माझी वृत्ति शंख चक्र व गदा धारण करणारा जो श्रीगोपालकृष्ण याचे ठिकाणी जडून तो संतुष्ट होईल. अशी कृपा करणारे आपण दयाळू आहात. कारण त्या श्रीगुरू निवृत्तीरायांनी माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचे मला दान देऊन अढळ अशा ब्रह्मपदाची प्राप्ती करून दिली. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *