ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.713

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-७ वे, संतमहिमा अभंग ७१३

संत भेटती आजी मज । तेणें मी झालो चतुर्भुज । दोन्ही भुजा स्थुळी सहज । दोन्ही सूक्ष्मी वाढल्या ॥१॥ अलिंगनी सुख वाटे । प्रेम चिदानंदी घोटे । हर्षे ब्रह्मांड उतटे । समुळ उठे मीपण ॥२॥ या संतांसी भेटतां । हरे संसाराची व्यथा । पुढतां पुढती माथां । अखंडित ठेवीन ॥३॥ या संतांचे देणें । कल्पतरूहूनि दुणे । परीसा परीस अगाध देणें । चिंतामणी ठेंगणा ॥४॥ या संतापरीस उदार । त्रिभुवनीं नाही थोर । मायबाप सहोदर । इष्टमित्र सोईरे ॥५॥ कृपाकटाक्षे न्याहाळिलें । आपुल्या पदी बसविलें । बापरखुमादेविवरें विठ्ठलें । भक्ता दिधलें वरदान ॥६॥

अर्थ:-आज मला संताची भेट झाली. त्यामुळे मी चतुर्भुज झालो. त्या चार भुजा म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरूषार्थ या चार भुजापैकी अर्थ व काम दोन पुरूषार्थ म्हणजे या दोन भुजा स्थूल आहेत व धर्म आणि मोक्ष या दोन भुजा वाढल्या.अशा ह्या चारी भुजा संतांच्या भेटीमुळे मला लाभल्या. संतांना आलिंगन देण्यात अतिशय सुख वाटते. त्याच्या ठिकाणी असलेले प्रेम चिदानंदरूप होते आनंद तर ब्रह्मांडाबाहेर जातो आणि शरीरावरचा अहंभाव समूळ नाहीसा होतो. या संतांच्या भेटीत संसाराची व्यथा नाहीसी होते. त्यांच्या चरणावर मी वारंवार मस्तक ठेवीन. या संताचे देणे कल्पतरूपेक्षा जास्त आहे. परिसापेक्षाही अधिक आहे. चिंतामणी तर त्यांच्या दानापुढे अगदी ठेंगणा आहे. आई, बाप, सहोदर किंवा इष्टमित्र यांच्याही पेक्षा माझे कल्याण करणारे संत आहेत. काय काय सांगावे त्रिभुवनांतही संताच्या इतके औदार्य कोणामध्ये नाही. ते ज्याच्याकडे कृपादृष्टीने पाहतात त्याला आपल्या योग्यतेला आणून बसवितात. ह्याप्रमाणे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यानी आपल्या भक्ताला वरदान दिले आहे.असे माऊली सांगतात.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-७ वे, संतमहिमा अभंग ७१३

संत भेटती आजी मज । तेणें मी झालो चतुर्भुज । दोन्ही भुजा स्थुळी सहज । दोन्ही सूक्ष्मी वाढल्या ॥१॥ अलिंगनी सुख वाटे । प्रेम चिदानंदी घोटे । हर्षे ब्रह्मांड उतटे । समुळ उठे मीपण ॥२॥ या संतांसी भेटतां । हरे संसाराची व्यथा । पुढतां पुढती माथां । अखंडित ठेवीन ॥३॥ या संतांचे देणें । कल्पतरूहूनि दुणे । परीसा परीस अगाध देणें । चिंतामणी ठेंगणा ॥४॥ या संतापरीस उदार । त्रिभुवनीं नाही थोर । मायबाप सहोदर । इष्टमित्र सोईरे ॥५॥ कृपाकटाक्षे न्याहाळिलें । आपुल्या पदी बसविलें । बापरखुमादेविवरें विठ्ठलें । भक्ता दिधलें वरदान ॥६॥

अर्थ:-
आज मला संताची भेट झाली. त्यामुळे मी चतुर्भुज झालो. त्या चार भुजा म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरूषार्थ या चार भुजापैकी अर्थ व काम दोन पुरूषार्थ म्हणजे या दोन भुजा स्थूल आहेत व धर्म आणि मोक्ष या दोन भुजा वाढल्या.अशा ह्या चारी भुजा संतांच्या भेटीमुळे मला लाभल्या. संतांना आलिंगन देण्यात अतिशय सुख वाटते. त्याच्या ठिकाणी असलेले प्रेम चिदानंदरूप होते आनंद तर ब्रह्मांडाबाहेर जातो आणि शरीरावरचा अहंभाव समूळ नाहीसा होतो. या संतांच्या भेटीत संसाराची व्यथा नाहीसी होते. त्यांच्या चरणावर मी वारंवार मस्तक ठेवीन. या संताचे देणे कल्पतरूपेक्षा जास्त आहे. परिसापेक्षाही अधिक आहे. चिंतामणी तर त्यांच्या दानापुढे अगदी ठेंगणा आहे. आई, बाप, सहोदर किंवा इष्टमित्र यांच्याही पेक्षा माझे कल्याण करणारे संत आहेत. काय काय सांगावे त्रिभुवनांतही संताच्या इतके औदार्य कोणामध्ये नाही. ते ज्याच्याकडे कृपादृष्टीने पाहतात त्याला आपल्या योग्यतेला आणून बसवितात. ह्याप्रमाणे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यानी आपल्या भक्ताला वरदान दिले आहे.असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *