ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.672

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६७२

आस्वादु स्वादु ये दोन्ही नाहीं । तेरावें पाही सहावा ठायीं ॥१॥ तेथें सातवें पंचाक्षरी जपणें । संहार होणें तमोरुपें ॥२॥ रखुमादेविवरु शुद्धसत्त्वेंवीण । शुद्धबुद्ध मी जाण जालेंगे माये ॥३॥

अर्थ:-

त्या परमात्म्याच्या ठिकाणी स्वाद, आस्वाद म्हणजे ज्ञान अज्ञान दोन्ही नाहीत. दहा इंद्रिये, चित्त व अहंकार या बाराजणांच्या पलीकडे असणारे जे तेरावे मन तेंही तेथे राहात नाही. असे सहा शास्त्रांत निर्णीत केले आहे.तेथे सातवें म्हणजे बुद्धीतत्त्वाने तमोगुणप्रधान होऊन सर्व जगाचा संहार करणारा जो शंकर त्याचा नमःशिवाय, या पंचाक्षराने जप करावा. रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल हे शुद्ध सत्त्वावाचून असणारे, शुद्ध बुद्ध परमात्मा मी स्वतःच झालो. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *