ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 542
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५४२
संसारचि नाहीं येथें या कारणे । नाहींच जन्मणें मरणें कैचें ॥१॥ भास तोही नासताहे कैचें निराकाश । सर्वी समरस परब्रह्म ॥२॥ जागृति या स्वप्न तेचि तें आलें । अंतरी बिंबले निश्चयेंसी ॥३॥ शार्वरी प्रकाश कांहीच नाठवे । अदृश्य सुईजे दृश्य जालें ॥४॥ बापरखुमादेविवर विठ्ठल तन्मय । ब्रह्मी ब्रह्ममय दिसे त्यासी ॥५॥
अर्थ:-
येथे म्हणजे ब्रह्मस्वरूपांच्या ठिकाणी या कारणे म्हणजे अज्ञान सत्य नसल्याने प्रतिती ला येणारा संसार व त्यातील जन्ममरण सत्य कसे असणार. जो आज भासत आहे हा संसार ही अधिष्ठानरूप ब्रह्मांत लय पावणारा आहे. मग परब्रह्म ही एकच वस्तु विश्वांत भरलेली आहे. म्हणून जागृतीत आगर स्वप्नांत तरी तिच्या वांचून दुसरे काय असणार अंतरमनांत तीच वस्तु (ब्रह्म) बिंबून राहिले आहे.रात्रीच्या प्रकाशात म्हणजे मायेच्या यथार्थ ज्ञानांत दृश्य अदृश्य होऊन काही दिसेनासे होते. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल म्हणतात जे ब्रह्मरूप झाले आहेत. त्यांना ब्रह्मात्म स्वरूपाच्या ठिकाणी सर्व ब्रह्मरूपच दिसणार असे माऊली सांगतात.