ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.731

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७३१

मी माझें अद्वैत द्वैत होउनी ठेलें । सद्गुरू एका बोलें ठेविलें ठायी ॥१॥ द्वैत गिळी अद्वैत मेळीं । चित्ताची काजळी तोडी वेगीं ॥२॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्ति उदार । दीपीं दीप स्थिर केला सोयी ॥३॥

अर्थ:-

एका सद्गुरूच्या महावाक्यउपदेशाने माझ्या ठिकाणचे मी व माझे द्वैत नाहीसे होऊन मला अद्वैत स्थिति प्राप्त झाली. माझ्या चित्तातील ही द्वैताचे अज्ञान त्या गुरुवचनाने तोडून टाकले. असे माझे श्रीगुरू निवृत्तिराय फार उदार आहेत. त्यांनी माझ्या ठिकाणची आत्मज्योति परमात्मरूप ज्योतिमध्ये एकरूप केली. माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *