ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.440
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४४०
तुर्या तें महाकारण नाहीं नाहीं जेथें । दर्शनाचे मतें माझा मीच ॥१॥ गोल्हाट त्रिकुट श्रीहाटातीत । महाकारणाची मात जेथ नाहीं ॥२॥ क्षर अक्षर अनाक्षर नाहीं । कूटस्थ सर्वही असवला ॥३॥ ज्ञानदेव म्हणे ऐसे हे पाहातां । निवृत्तीने तत्त्वत कथनी केली ॥४॥
अर्थ:-
ज्या अवस्थेमध्ये तुर्या अवस्था महाकारण देह हे सर्व नाहीसे होऊन एक आत्मवस्तुच राहाते. गोल्हाट, त्रिकुट, श्रीहाट व महाकारणदेह यांची गोष्ट त्याठिकाणी नाही. त्या स्थितीत क्षर, अक्षर व अनाक्षर भाव उरत नाही सर्वांची मिथ्या प्रतीती कूटस्थावरच येते. वरिल सर्व गोष्टी निवृत्तीनाथांनी आम्हाला सांगितल्या असे माऊली ज्ञानदेव सांगतात..