ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 558

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५५८

ज्ञानप्राप्ती लागीं व्हावे अति नीच । म्हणवी जो उच्च सिद्ध नोहे ॥२॥ अहंता समुळ करावा कीं त्याग । काम क्रोध मांग शिवूं नये ॥२॥ सात्त्विक वैराग्य परिपूर्ण शांति । दैविक संपत्ति सांडी केवीं ॥३॥ व्हावे निराभास तरीच ही प्राप्ती । ज्ञानेश्वरा भ्रांति कीं रे नाहीं ॥४॥

अर्थ:-

ब्रह्मज्ञान प्राप्तीकरता सद्गुरुपदी अति नम्र व्हावे लागते. गर्वाने फुगून जाऊन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केल्यास ते सिद्धीस जात नाही. याकरिता अहंकार समूळ काढावा व काम क्रोध या मांगांना तर शिवूच नये. सात्त्विक वैराग्य पूर्ण शांति व दैवि संपत्ति टाकून कसे चालेल? जगत् मिथ्या आहे. ही भ्रांती जाऊन ज्ञानाची प्राप्ती झाली असे समजावे. आमच्या ठिकाणी जगत् सत्यत्व भ्रांती राहिली नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *