ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.639

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६३९

अंजनी संपूर्ण ठेऊनियां मन । ज्ञानी ज्ञान घन निरालंबी ॥१॥ आदि मध्य आंतु नसोनियां दिसे । पाठीं पोंटीं वसे निघोट रया ॥२॥ श्रवण नयन जाति गोतपण । जीवशीवा खूण आत्मपणें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे वाच्या वाचक योगें । हरिवीण वाउगें नाहीं रया ॥४॥

अर्थ:-

निरालंब म्हणजे ज्याला स्वरुपाशिवाय दुसरा आधार नाही. अशा ज्ञानघन परमात्मरुप अंजनाचे ठिकाणी संपूर्ण मन ठेवून ज्ञानोदय झाला असता, नसून दिसणाऱ्या सर्व त्रैलोक्याच्या आदि मध्ये अंताला व पाठी पोटीही निघोट म्हणजे निष्प्रतिबंध ज्याची व्याप्ति दिसत आहे. ती केवळ परमात्म्याचीच आहे. जातीगोताची अडचण मनांत न आणता, वाच्य वाचकाचे रितीने जीव शीवाचे आत्मरुपाने ‘ऐक्य समजून ‘ श्रवण नयन’ म्हणजे कानानी ऐकणे किंवा डोळ्यांनी पाहाणे हे एक परमात्मविषयाला करावे. वाच्य वाचक हे सर्व हरिच आहे. त्याच्यावाचून सर्व मिथ्या आहे.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *