संत तुकाराम म. चरित्र १
संत तुकाराम
ज्यांच्यामुळं भागवत धर्माची पताका महाराष्टातील घरांघरांत झाला, ते पात्र घेऊन येत आहे.
*संत तुकाराम महाराज !*
संत तुकाराम भाग-१
तुकाराम महाराज यांचे चरित्र्य सुरुवात करण्यापुर्वी त्यांच्या पुर्वीच्या सात-आठ पिढ्यांची माहिती सांगणे आवश्यक आहे, कारण तुकाराम कसे घडले ? विठ्ठलाच्या भजनी कसे लागले ? त्याशिवाय कळणार नाही.
पुण्याच्या उत्तरेस सुमारे दहा कोसांवर इंद्रायणी नदीच्या तीरी देहु हे तुकारामाचे जन्म गांव. देहु गावातील प्रतिष्ठीत घराण्यांत तुकोबांच्या घराण्याची गणना होत होती. या घराण्याकडे महाजनकीची मिरास, बाजारपेठेतील महाजनकीचा वाडा, महाजनकीचा अधिकार व उत्पन्न, श्रीसंनिध वाडा आणि श्रीची पुजाअर्चा पुर्वीपासुन होते. याशिवाय त्यांचे वडिल शेती, सावकारी, आणि वाण्याचे दुकान चालवित. विठोबा हे त्यांचे कुलदैवत !
सातार्या जिल्हात जावळी येथे मोरे घराणे शेकडों वर्षे नांदत होते. महाराष्टातील मराठा सरदारात या घराण्याला बरेच महत्व होते. परंतु कौरव-पांडवांपासुन चालत आलेली क्षत्रियातील भाऊबंदकी ह्या मोरे घराण्यांत जन्माला आल्यामुळे अनेक अनिष्ट प्रकार होऊ लागल्यामुळे घराण्यांच्या लौकीकास कमीपणा येऊ लागला. या सर्व गोष्टींमुळे विश्वंभराचे मन उचाट, उदास झाल्याने त्यांनी घरादाराचा, भाऊबंदगीचा त्याग करुन कायमची जावळी सोडुन देहु गांवी कायमचे वास्तव्य केले. थोड्याच दिवसांत देहु गांवची महाजनकी, शेतीवाडी संपादन करुन घराण्याच्या मुळ वैभवास साजेसा लौकीक मिळवला. पण एवढे करुनही त्यांना समाधान लाभेना. संसाराची उदासीनता वाढु लागली. संसारसुखापेक्षा परमार्थाकडे त्यांचा कल दिसुं लागला.
विश्वभरांनी संसारांतुन मन काढून अहोरात्र भजनांत वेळ घालवुन पंढरपुरच्या अनेक वार्या केल्यात. पुढे ते थकल्यामुळे वारी करतां येत नसल्यामुळे ते सारखे तळमळत. त्यांची भक्ती पाहुन त्यांना दृष्टांत झाला की, आंबेवनात विठोबाची यां मुर्ति आहे तीचे पुजन कर !
विठोबाचा मुलगा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचा कान्हया, कान्हयाचा मुलगा बोल्होबा! बोल्होबाचा आणि कनकाईचा चाळीस वर्षानंतर झालेला पुत्र म्हणजेच तुकोबा, आपले तुकाराम महाराज!
विश्वंभर व त्यांची बायको आमाबाई ह्यांना हरी व मुकुंद असे दोन पुत्र होते. त्या दोघांनी चंदीचंदावरकरांचे पदरी नोकरी धरुन पराक्रमाने सरदारकी मिळवली. विश्वंभर मरण पावल्यावर पुत्रांनी आमाबाईला व कुटुंबाला चंदीचंदावरला नेले. पण तीचे मन देहुकडेच लागले होते. पुढे परचक्र येऊन लढाईत दोघेही ठार झालेत. दोन्ही सुनांपैकी एक गर्भवती होती. तीला विठोबा नांवाचा मुलगा झाला.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख