ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.676

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६७६

आस पुरऊनि आस पुरवावी । ऐसी भूक मज लागो द्यावी ॥१॥ तें अनुपम्य कैसेनि सांगावें । जीवा चोरुनि भोगिजे तें जीवें ॥२॥ दृष्टि कीर होय जरी निकें । द्रष्टा होय वेडा जयाचेंनि सुखे ॥३॥ ज्ञानदेवो म्हणे करुनियां निकें । विठ्ठल परमात्मा भेटेल या फावतें ॥४॥

अर्थ:-

आपण स्वतः परमात्म्याचे दर्शन घेऊन दुसऱ्याच्याही दर्शनाची आशा पूर्ण करावी. अशा रितीची भूक मला लागावी. जे अनुपमेय परमात्मतत्त्व ते कोणत्या शब्दाने सांगिवे? तें परमात्मसौख्य जीवाला चोरुन त्याचा जीवाने उपभोग घ्यावा. असे तें परमात्मतत्त्व आहे. अशा तहेची आत्मस्वरुपा विषयी स्वच्छदृष्टि झाली असतां आत्मस्वरुपाला पाहाणारा परमात्मसौख्याने वेडा होऊन जातो. आत्मस्वरुपाविषयी चांगला विचार केला असतांन श्रीविठ्ठल जो परमात्मा तो भेटून त्याचे स्वरुप प्राप्त होते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *