ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.613

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६१३

मी तूं प्रवृत्तीसी आलें । समग्र गिळिलें वासनेसी ॥१॥ नाही त्यास मेरु कैंचा विवेकु । जनवन लोकु ब्रह्म दिसे ॥२॥ उजेडली शांति मावळली निशी । अवघा ब्रह्मरसी पाजळलें ॥३॥ ज्ञानदेवा चित्तीं क्षमाचि उपजली । प्रवृत्ति सामावली निवृत्ति रया ॥४॥

अर्थ:-

श्रीगुरु निवृत्तीरायांच्या कृपेने ब्रह्मात्म बोध उजाळला. म्हणून त्या बोधाने मी तुं हे द्वैत व त्या द्वैताच्या आश्रयावर असणाऱ्या वासना या सर्वांचा नाश होऊन गेला. तो बोध सर्वात श्रेष्ठ असल्यामुळे त्याच्यापुढे जन, वन, पर्वत इत्यादिकांचा विचारही शिल्लक राहात नाही. सर्वत्र ब्रह्मरुपच दिसते. अज्ञान नष्ट होऊन, शांती उदयाला आल्यामुळे सर्व संसार ब्रह्मरसाने प्रकाशित झाला. माझ्या चित्तांत क्षमा उदय पावून त्यांत सर्व प्रवृत्ति मावळून गेली. ही सर्व श्री गुरु निवृत्तिरायांची कृपा आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *