ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.489

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ४८९

घटु जें जें होय आधींच गगन । राहे पैं व्यापून वेगळेंची ॥१॥ मायोपाधी सृष्टि जें जें कांहीं होत । चैतन्य व्यापित त्याची माजीं ॥२॥ विवर्तते माया तद्विवर्त जीव । सृष्टि कारणत्व भोग्यपर ॥३॥ भासचतुष्टयता दोन्ही अनादि । जाहली उपाधि मुळीहुनी ॥४॥ गुरूकृपायोगें ज्ञानदेव खूण । भेदुनी निर्वाण लीन झाला ॥५॥

अर्थ:-

घट निर्माण होण्यापूर्वी आकाश अगोदरच सर्वत्र व्याप्त असतेच व घट निर्माण झाल्यावर घटामुळे घटापुरते वेगळे वाटते. म्हणजे त्याला ‘घटाकाश म्हणतो. त्याप्रमाणे मायिक सर्व पदार्थ निर्माण होण्यापूर्वी चैतन्य सर्वत्र असतेच ते या पदार्थाच्या उपाधीमुळे वेगळेपणाने भासते त्यामुळे ब्रह्माची प्रतिती ब्रह्मरूपाने न येता जगतरूपाने येते. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी माया व मायाकाय पदार्थ हे विवर्त म्हणजे अध्यस्त आहे. जीव ईश्वर भाव हे मायेमुळे आहे. त्यामुळे ईश्वराच्या ठिकाणी दिसणारी कारणता व माया कार्य पदार्थाच्या ठिकाणी दिसणार भोग्यता ही सर्व ब्रह्मस्वरूपावर अध्यस्त आहे. माया व मायाकार्य पदार्थ हे अनादि आहेत.त्या मायेमुळे ब्रह्म साकार झाले. त्या मायेचा निरास करून आम्ही ब्रह्मस्वरूप झालो. ही खूण आम्हाला गुरूकृपेने कळली. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *