ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.484
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ४८४
मंत्र तंत्र मंत्र सर्वही अबध्द । जव नाही शुध्द अंतःकरण ॥१॥ गुरुशिष्यपण हेंही मायिकत्व । जंव निजतत्व न ओळखी ॥२॥ प्राप्त जरी झाली अष्टसिद्धी जाण । मागुती बंधन दृढ होय ॥३॥ आत्मरुपावीण साधन अन्यत्र । भ्रमाशीच पात्र होईजे कीं ॥४॥ सर्व वृत्ति शून्य म्हणे तोचि धन्य । ज्ञीनदेव मान्य सर्वस्वेंशी ॥५॥
अर्थ:-
जोपर्यंत अंतःकरण शुद्ध झाल नाहा. तो पर्यंत मंत्र तंत्र व यंत्र या ज्ञानप्राप्ती करता केलेल्या खटपटी व्यर्थ आहेत. जोपर्यंत आत्मदर्शन झाले नाही तो पर्यंत गुरुशिष्यपणाही व्यर्थ आहे. योगाभ्यास करून अष्टमहासिदी प्राप्त झाल्या, तरी त्या बंधनालाच हेतु आहेत.आत्मज्ञान प्राप्तीवांचून केलेली सर्व साधने भ्रममूलकच आहेत.आत्मज्ञानाने ज्याच्या सर्व वृत्ति बाधित झाल्या तोच एक पुरुष धन्य आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.