अष्टभाव

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇


||अष्टभाव||

भक्त किती वर्षे मार्ग मध्ये आहे.
त्याच्या जेष्ठतेवरून त्याचा भक्ती मार्गातील – प्रगती मोजमाप होत नसून तो कुठल्या स्थितीत यावरून त्याच्यी अध्यात्मिक प्रगती ओळखली जाते….

१】प्रथमभाव-स्वेद :-
मंत्र ,स्तोत्र,जप करताना ग्रंथ पठण करताना शरीराला घाम येतो हा प्रथम भाव. असा अनुभव येत असेल तर त्याचा अर्थ त्याच्यी  सेवा पूर्व जन्मातील प्रारब्द शुद्ध करण्यात खर्च होते.
२】दुसरा भाव-कंप :-
या भावात पोहचवलावर भक्ताला शरीराला कंप सुटतो.शरीरात कंप जाणवते.
३】तिसरा भाव- रोमांच :-
स्वामींचा अगर इतर देवांचा जप करताना पोथी वाचताना अनुभव सांगताना शहारे आले तर सेवेत तिसरा भावात समजवा.
४】चतुर्थ भाव- अश्रू :-
महाराजांचे आठवणीने ह्यूदय भरून आले तर आनंदाश्रू येतात. हा भाव सेवेकऱ्याची ह्यूदयाची शुद्धी करतो. अशा सेवेकऱ्याकडून स्वामी काव्य ही निर्माण होते. खरे म्हणजे या भावात गेल्यावर सेवा काल वाढवायला हवा. निदान एकच आसनवर बसून एका तासावर जप करायला हवा.अशी दीड वर्ष साधना केली तर भक्त पंचम भावात प्रवेश करतो.
५】पंचम भाव -सत्वापत्ती :-
याभावात प्रवेश केल्यावर  अनुसंधान जास्त वेळ टिकते. अंतर्गत ईश्वरीय संकेत मिळतात. स्वामी मय होऊन जातो. पण सर्व सामान्य माणसे चवथा भावापर्यंत या जन्मात पोहचतात व पुढच्या जन्मात पुढचा अध्यात्मिक प्रवास सुरू होतो. 
६】षष्ट भाव-समाप्ती :-
या भावात प्रवेश झाल्यावर हळूहळू सुख दु:ख मान अपमान निंदा स्तुती सर्व समान वाटु लागतात. अभिमान अहंकार नष्ट व्हायला सुरुवात होते. सतगुण वाढू लागतात.
७】सप्तम भाव- असंसक्ती :-
सातव्या भावात प्रवेश केल्यास देवतांची दर्शन-साक्षात्कार-संभाषण होतात. षटचकरे जागरूक होतात-इतरांच्या भूत भविष्य समजत, बोललेले शब्द सत्य होतात. या भावात गुरु दुर्लक्ष करतात साधकाला स्वबळावर आपली प्रगती करावी लागते. व जन कल्याणाचे कार्य करावे.
८】अष्टमभाव-प्रलय :-
या भावात साधक ईश्वराशी एकरुप होतो.  सिद्ध अवस्था प्राप्त होते. पुढील जन्मात पण ते सर्व विभागात काम करून जनकल्याणाचे कार्य करतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *