ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.789

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७८९

चतुर्देहाची भरणी पुरली । एकाएकीं देखिली निजतनु ॥१॥ त्याचें नांव गोवळु फिटला काळ वेळु । जाला सकळु सकळांसहित ॥२॥ ऐसा बापरखुमादेविवरू सुंदरू । तेणें माझा वेव्हारू खंडियेला ॥३॥

अर्थ:-

स्थूल, सूक्ष्म कारण, महाकारण या चार देहांची मजजवळ असलेली सामुग्री संपली. ती संपल्याबरोबर एकाएकी आत्मस्वरूपपाहीले. त्याचे नांव परमात्मा भगवान श्रीकृष्ण असे आहे. त्याच्या दर्शनाने सर्वत्र परमात्मरूप झाल्यामुळे आता काळवेळाची भीती राहिली नाही. त्याच्यामुळे सर्वत्रत्याचेच दर्शन होत आहे. अशा प्रकारे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे सुंदर श्रीविठ्ठल त्यानी माझा हा जन्ममरणाचा व्यवहार सांडून टाकलाअसे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *