ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.640

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६४०

ज्ञाने ध्यान पटी तंतु पै मनाचा । हरिरुप वाचा सारीपाठ ॥१॥ स्वरुप कामारी वागपुष्पं चारी । विरुळा मापारी जाणे खूण ॥२॥ त्रिगुण सवडी घालुनी उलथी । एकरुप पंक्ति जेवी नरु ॥३॥ ज्ञानदेवीं घर तत्त्वतां निर्गुण । परेचे संपूर्ण घर केलें ॥४॥

अर्थ:-

ज्ञानाचा किंवा ध्यानाचा व्यवहार हाच कोणी पट आहे. अशी कल्पना केली तर त्याला तंतू जर कोणी असेल तर तो मनाचाच आहे. आणि त्या पटावर हरिनाम वाणीचा सोंगट्याचा खेळ आहे. स्वरुपप्राप्तीची इच्छा जर असेल तर भगवन्नामाच्या उच्चाराची चार पुष्पे मांडावी.असी खूण जाणणारा नाममंत्राचे माप टाकणारा फार विरळा.असा मापारी त्रिगुणाचे सवडीत न लपता तिला उलथी करुन एकरुपाने श्रीहरिच्या पंक्तिस भोजन करतो. मी तत्त्वतः ज्ञानरुप वाणीचे जे मुख्य घर निर्गुण परमात्माच केले आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *